माजी सैनिकानं केली द्राक्षांची शेती, विक्रमी दर, पण हातात काय? सगळा हिशोबच मांडला!

Last Updated:
Grapes Farming: अतिवृष्टी आणि वटवाघळांचा हल्ला अशा संकटातून सांगलीच्या माजी सैनिकाने द्राक्षांची बाग वाचवलीये. आता त्यांना विक्रमी 551 रुपयांचा दर मिळाला आहे.
1/7
अतिवृष्टी आणि बदलत्या हवामानात द्राक्षांचं बाग टिकवणं हे जणून आव्हानच असतं. पण सीमेवर अनेक आव्हांनाचा सामना करणाऱ्या सांगलीच्या निवृत्त जवानानं हे आव्हान लिलया पेललंय. पलुस तालुक्यातील नागठाणे येथे माजी सैनिक धनाजी पाटील यांची द्राक्ष बाग आहे. यंदा त्यांच्या द्राक्षांना विक्रमी 551 रुपयांचा विक्रमी भाव मिळाला आहे.
अतिवृष्टी आणि बदलत्या हवामानात द्राक्षांचं बाग टिकवणं हे जणून आव्हानच असतं. पण सीमेवर अनेक आव्हांनाचा सामना करणाऱ्या सांगलीच्या निवृत्त जवानानं हे आव्हान लिलया पेललंय. पलुस तालुक्यातील नागठाणे येथे माजी सैनिक धनाजी पाटील यांची द्राक्ष बाग आहे. यंदा त्यांच्या द्राक्षांना विक्रमी 551 रुपयांचा विक्रमी भाव मिळाला आहे.
advertisement
2/7
माजी सैनिक धनाजी पाटील यांची नागठाणे येथे 12 एकर शेती आहे. यापैकी 62 गुंठे शेतामध्ये त्यांनी द्राक्षबाग पिकवली आहे. 2014 पासून ते कृष्णा द्राक्ष व्हरायटीचे उत्पादन घेतात. अतिवृष्टीच्या काळात देखील त्यांनी उभ्या पावसामध्ये 9 सप्टेंबर 2024 रोजी बागेची पीक छाटणी घेतली. पीक छाटणी पासून डंपिंगपर्यंत पूर्ण काळ पावसाचा सामना केला.
माजी सैनिक धनाजी पाटील यांची नागठाणे येथे 12 एकर शेती आहे. यापैकी 62 गुंठे शेतामध्ये त्यांनी द्राक्षबाग पिकवली आहे. 2014 पासून ते कृष्णा द्राक्ष व्हरायटीचे उत्पादन घेतात. अतिवृष्टीच्या काळात देखील त्यांनी उभ्या पावसामध्ये 9 सप्टेंबर 2024 रोजी बागेची पीक छाटणी घेतली. पीक छाटणी पासून डंपिंगपर्यंत पूर्ण काळ पावसाचा सामना केला.
advertisement
3/7
सततच्या बदलत्या हवामानाने द्राक्ष बागेमध्ये औषधांचा खर्च वाढला आहे. अति पाऊस आणि दाट धुक्याचा सामना करण्यासाठी द्राक्ष पिकास महागडी औषधे द्यावी लागत आहेत. धनाजी पाटील यांना 62 गुंठे द्राक्ष बागेसाठी तब्बल 5 लाख 77 हजार रुपये इतका खर्च आला.
सततच्या बदलत्या हवामानाने द्राक्ष बागेमध्ये औषधांचा खर्च वाढला आहे. अति पाऊस आणि दाट धुक्याचा सामना करण्यासाठी द्राक्ष पिकास महागडी औषधे द्यावी लागत आहेत. धनाजी पाटील यांना 62 गुंठे द्राक्ष बागेसाठी तब्बल 5 लाख 77 हजार रुपये इतका खर्च आला.
advertisement
4/7
100 दिवस पूर्ण होताच पाटील द्राक्ष बागेवर वटवाघळांचा हल्ला झाला. द्राक्षामध्ये गोडी उतरताना वटवाघळांची धाड येताच त्यांनी घाई- घाईने बागेवर जाळी अंथरून घेतली. वटवाघळांपासून बागेचे संरक्षण करण्यासाठी त्यांना 62 हजार इतका खर्च करावा लागला. कष्टाने पिकवलेल्या बागेचे त्यांनी चलाकीने संरक्षण केले.
100 दिवस पूर्ण होताच पाटील द्राक्ष बागेवर वटवाघळांचा हल्ला झाला. द्राक्षामध्ये गोडी उतरताना वटवाघळांची धाड येताच त्यांनी घाई- घाईने बागेवर जाळी अंथरून घेतली. वटवाघळांपासून बागेचे संरक्षण करण्यासाठी त्यांना 62 हजार इतका खर्च करावा लागला. कष्टाने पिकवलेल्या बागेचे त्यांनी चलाकीने संरक्षण केले.
advertisement
5/7
अतिवृष्टी आणि वटवाघळांच्या हल्ल्यातून वाचवलेली बाग पाटील यांनी विक्रीसाठी दिली. पण हार्वेस्टिंगच्या वेळी पुन्हा धुके वाढल्याने द्राक्ष मालाचे नुकसान झाले. द्राक्ष मालामध्ये मोठ्या प्रमाणात क्रॅकिंग झाले आणि उत्पादनास फटका बसला. दाट धुक्याने दीड ते पावणे दोन टन मालाचा सुकवा झाला.
अतिवृष्टी आणि वटवाघळांच्या हल्ल्यातून वाचवलेली बाग पाटील यांनी विक्रीसाठी दिली. पण हार्वेस्टिंगच्या वेळी पुन्हा धुके वाढल्याने द्राक्ष मालाचे नुकसान झाले. द्राक्ष मालामध्ये मोठ्या प्रमाणात क्रॅकिंग झाले आणि उत्पादनास फटका बसला. दाट धुक्याने दीड ते पावणे दोन टन मालाचा सुकवा झाला.
advertisement
6/7
62 गुंठ्यामध्ये 7 टन 840 किलो उत्पादन मिळाले. यामधून त्यांना 8 लाखांची कमाई झाली आहे. परंतु अपेक्षित उत्पादन मिळाले नसल्याची नाराजी पाटील यांनी लोकल 18 शी बोलताना व्यक्त केली. त्यांचा अनुभव आणि प्रयत्नांच्या गणितानुसार अधिक उत्पादनाची अपेक्षा होती.
62 गुंठ्यामध्ये 7 टन 840 किलो उत्पादन मिळाले. यामधून त्यांना 8 लाखांची कमाई झाली आहे. परंतु अपेक्षित उत्पादन मिळाले नसल्याची नाराजी पाटील यांनी लोकल 18 शी बोलताना व्यक्त केली. त्यांचा अनुभव आणि प्रयत्नांच्या गणितानुसार अधिक उत्पादनाची अपेक्षा होती.
advertisement
7/7
आता द्राक्षांना प्रति 4 किलोला विक्रमी 551 रुपयांचा दर मिळाला. पाटील यांच्या मते एक किलो द्राक्ष तयार करण्यासाठी 100 रुपये उत्पादन खर्च आला आणि 4 किलो द्राक्षासाठी 551 रुपये दर मिळाला. मिळालेल्या दरातून उत्पादन खर्च वजा करता शेतकऱ्याचा कष्टाप्रमाणे समाधानकारक नफा मिळत नाही, अशी खंत पाटील व्यक्त करातत. (प्रिती निकम, प्रतिनिधी)
आता द्राक्षांना प्रति 4 किलोला विक्रमी 551 रुपयांचा दर मिळाला. पाटील यांच्या मते एक किलो द्राक्ष तयार करण्यासाठी 100 रुपये उत्पादन खर्च आला आणि 4 किलो द्राक्षासाठी 551 रुपये दर मिळाला. मिळालेल्या दरातून उत्पादन खर्च वजा करता शेतकऱ्याचा कष्टाप्रमाणे समाधानकारक नफा मिळत नाही, अशी खंत पाटील व्यक्त करातत. (प्रिती निकम, प्रतिनिधी)
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement