पंतप्रधानांच्या नातीचा सिनेमात सुपरहिट डेब्यू, पण अचानक झाली गायब; मग OTT वर जबरदस्त कमबॅक

Last Updated:
आजची गोष्ट अशाच एका 'राजकुमारी'ची आहे, जिने राजवाड्याचं सुख सोडून सिनेसृष्टीची खडतर वाट निवडली, जिने यशाचं सर्वोच्च शिखर पाहिलं आणि दुर्दैवाने कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचा सामनाही केला.
1/7
आपण आपल्या आयुष्यात अनेकदा संकटांनी खचून जातो. एखादं मोठं संकट आलं की वाटतं आता सगळं संपलं. पण खरी जिद्द तिलाच म्हणतात, जी शून्यातून विश्व निर्माण करते आणि मृत्यूच्या दारातून परत येऊन पुन्हा यशाचं शिखर गाठते. आजची गोष्ट अशाच एका 'राजकुमारी'ची आहे, जिने राजवाड्याचं सुख सोडून सिनेसृष्टीची खडतर वाट निवडली, जिने यशाचं सर्वोच्च शिखर पाहिलं आणि दुर्दैवाने कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचा सामनाही केला.
आपण आपल्या आयुष्यात अनेकदा संकटांनी खचून जातो. एखादं मोठं संकट आलं की वाटतं आता सगळं संपलं. पण खरी जिद्द तिलाच म्हणतात, जी शून्यातून विश्व निर्माण करते आणि मृत्यूच्या दारातून परत येऊन पुन्हा यशाचं शिखर गाठते. आजची गोष्ट अशाच एका 'राजकुमारी'ची आहे, जिने राजवाड्याचं सुख सोडून सिनेसृष्टीची खडतर वाट निवडली, जिने यशाचं सर्वोच्च शिखर पाहिलं आणि दुर्दैवाने कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचा सामनाही केला.
advertisement
2/7
ही गोष्ट आहे बॉलीवूडची 'मनाचा' ठाव घेणारी अभिनेत्री मनीषा कोईराला हिची. जिचा प्रवास एखाद्या चित्रपट कथेपेक्षा कमी नाही.
ही गोष्ट आहे बॉलीवूडची 'मनाचा' ठाव घेणारी अभिनेत्री मनीषा कोईराला हिची. जिचा प्रवास एखाद्या चित्रपट कथेपेक्षा कमी नाही.
advertisement
3/7
16 ऑगस्ट 1970 रोजी नेपाळच्या काठमांडूमध्ये मनीषाचा जन्म झाला. ती साधीसुधी मुलगी नव्हती, तर चक्क नेपाळच्या राजघराण्यातील राजकुमारी होती. तिचे आजोबा बी.पी. कोईराला हे नेपाळचे पहिले पंतप्रधान होते. राजकारण आणि सत्तेच्या गराड्यात वाढलेली ही मुलगी पडद्यावर नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आली. 1991 मध्ये सुभाष घई यांच्या 'सौदागर' चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं आणि पहिल्याच सिनेमातून ती रातोरात स्टार झाली.
16 ऑगस्ट 1970 रोजी नेपाळच्या काठमांडूमध्ये मनीषाचा जन्म झाला. ती साधीसुधी मुलगी नव्हती, तर चक्क नेपाळच्या राजघराण्यातील राजकुमारी होती. तिचे आजोबा बी.पी. कोईराला हे नेपाळचे पहिले पंतप्रधान होते. राजकारण आणि सत्तेच्या गराड्यात वाढलेली ही मुलगी पडद्यावर नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आली. 1991 मध्ये सुभाष घई यांच्या 'सौदागर' चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं आणि पहिल्याच सिनेमातून ती रातोरात स्टार झाली.
advertisement
4/7
90 च्या दशकातील 'क्वीन' आणि सुवर्णकाळसौदागरनंतर मनीषाने मागे वळून पाहिलं नाही. '1942: ए लव्ह स्टोरी', 'बॉम्बे', 'दिल से', 'खामोशी' आणि 'मन' यांसारख्या सिनेमांतून तिने अभिनयाची अशी जादू चालवली की तिने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. 90 च्या दशकात ती टॉपची अभिनेत्री होती. तिचे सौंदर्य आणि तितकाच दमदार अभिनय पाहून प्रत्येक दिग्दर्शकाला तिला आपल्या सिनेमात घ्यायचं होतं. मात्र, यशाच्या शिखरावर असतानाच काही फ्लॉप चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतारांमुळे तिला थोडा संघर्ष करावा लागला.
90 च्या दशकातील 'क्वीन' आणि सुवर्णकाळसौदागरनंतर मनीषाने मागे वळून पाहिलं नाही. '1942: ए लव्ह स्टोरी', 'बॉम्बे', 'दिल से', 'खामोशी' आणि 'मन' यांसारख्या सिनेमांतून तिने अभिनयाची अशी जादू चालवली की तिने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. 90 च्या दशकात ती टॉपची अभिनेत्री होती. तिचे सौंदर्य आणि तितकाच दमदार अभिनय पाहून प्रत्येक दिग्दर्शकाला तिला आपल्या सिनेमात घ्यायचं होतं. मात्र, यशाच्या शिखरावर असतानाच काही फ्लॉप चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतारांमुळे तिला थोडा संघर्ष करावा लागला.
advertisement
5/7
2012 मध्ये मनीषाच्या आयुष्यात सर्वात मोठं वादळ आलं. तिला डिम्बग्रंथीचा कर्करोग (Ovarian Cancer) असल्याचं निदान झालं. ज्या चेहऱ्याने करोडो लोकांना वेड लावलं होतं, तो चेहरा आता रुग्णालयाच्या बेडवर वेदना सहन करत होता. न्यूयॉर्कमध्ये तिच्यावर उपचार झाले. मृत्यूशी वर्षभर झुंज दिल्यानंतर 2013 मध्ये ती कॅन्सरमुक्त झाली. तिने तिचा हा प्रवास 'हील्ड' (Healed) या पुस्तकातून जगासमोर मांडला, जो आजही अनेक रुग्णांसाठी प्रेरणादायी ठरतोय.
2012 मध्ये मनीषाच्या आयुष्यात सर्वात मोठं वादळ आलं. तिला डिम्बग्रंथीचा कर्करोग (Ovarian Cancer) असल्याचं निदान झालं. ज्या चेहऱ्याने करोडो लोकांना वेड लावलं होतं, तो चेहरा आता रुग्णालयाच्या बेडवर वेदना सहन करत होता. न्यूयॉर्कमध्ये तिच्यावर उपचार झाले. मृत्यूशी वर्षभर झुंज दिल्यानंतर 2013 मध्ये ती कॅन्सरमुक्त झाली. तिने तिचा हा प्रवास 'हील्ड' (Healed) या पुस्तकातून जगासमोर मांडला, जो आजही अनेक रुग्णांसाठी प्रेरणादायी ठरतोय.
advertisement
6/7
कॅन्सरनंतर मनीषाने हार मानली नाही.2017-18 मध्ये 'डियर माया', 'लस्ट स्टोरीज' आणि 'संजू' सारख्या चित्रपटातून तिने कमबॅक केलं. पण तिचं खरं 'विराट' रूप पाहायला मिळालं ते संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी: द डायमंड बाजार' या वेब सीरिजमध्ये. 'मलिकाजान' ही व्यक्तिरेखा तिने इतक्या ताकदीने साकारली की पुन्हा एकदा जगाला मनीषा कोईराला नावाच्या सैंदर्याची जाणीव झाली.
कॅन्सरनंतर मनीषाने हार मानली नाही.2017-18 मध्ये 'डियर माया', 'लस्ट स्टोरीज' आणि 'संजू' सारख्या चित्रपटातून तिने कमबॅक केलं. पण तिचं खरं 'विराट' रूप पाहायला मिळालं ते संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी: द डायमंड बाजार' या वेब सीरिजमध्ये. 'मलिकाजान' ही व्यक्तिरेखा तिने इतक्या ताकदीने साकारली की पुन्हा एकदा जगाला मनीषा कोईराला नावाच्या सैंदर्याची जाणीव झाली.
advertisement
7/7
राजकुमारी ते कॅन्सर सर्व्हायव्हर आणि आता 'ओटीटी क्वीन' असा हा मनीषाचा प्रवास केवळ चित्रपट सृष्टीसाठीच नाही, तर आयुष्य जगणाऱ्या प्रत्येकासाठी एक मोठी शिकवण आहे.
राजकुमारी ते कॅन्सर सर्व्हायव्हर आणि आता 'ओटीटी क्वीन' असा हा मनीषाचा प्रवास केवळ चित्रपट सृष्टीसाठीच नाही, तर आयुष्य जगणाऱ्या प्रत्येकासाठी एक मोठी शिकवण आहे.
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement