advertisement

Sagar Karande : 'इंडस्ट्रीतल्या मित्रांनी माझ्याविरोधात कारस्थानं केली', सागर कारंडेचा शॉकिंग खुलासा

Last Updated:
अभिनेता सागर कारंडे सध्या बिग बॉस मराठी 6 च्या घरात आहे. इंडस्ट्रीतल्या मित्रांनी माझ्या विरोधात कारस्थानं केल्याचं सागरनं पहिल्यांदाच सांगितलं.
1/9
मराठी नाटक, मालिका, सिनेमांतून प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता सागर कारंडे. चला हवा येऊ द्या या शोमधून सागर कारंडेला घराघरात ओळख मिळाली. सागर कारंडेनं त्याच्या अभिनायची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली. सागर कारंडे सध्या बिग बॉस मराठी 6 च्या घरात आहे. दरम्यान सागर कारंडेची एक मुलाखत समोर आली आहे ज्यात त्यानं इंडस्ट्रीतील लोकांनी त्याच्या विरोधात कारस्थानं केल्याचा धक्कादायक खुलासा केला. 
मराठी नाटक, मालिका, सिनेमांतून प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता सागर कारंडे. चला हवा येऊ द्या या शोमधून सागर कारंडेला घराघरात ओळख मिळाली. सागर कारंडेनं त्याच्या अभिनायची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली. सागर कारंडे सध्या बिग बॉस मराठी 6 च्या घरात आहे. दरम्यान सागर कारंडेची एक मुलाखत समोर आली आहे ज्यात त्यानं इंडस्ट्रीतील लोकांनी त्याच्या विरोधात कारस्थानं केल्याचा धक्कादायक खुलासा केला. 
advertisement
2/9
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सागर कारंडेनं हा खुलासा केला. सागर कारंडे म्हणाला,
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सागर कारंडेनं हा खुलासा केला. सागर कारंडे म्हणाला, "मी स्पष्ट बोलल्याचे मला तोटे झालेत. आपण एखाद्याला एक गोष्ट सांगितली की हे असं नको असं कर तर त्याला राग यायचा. कोणी असेल मग, दिग्दर्शक, लेखक, प्रोड्यूसर, आपण सांगणंच चुकीचं आहे असं वाटतं. पण मला ते पटत नाही, मला ते कुठेतरी खटकत."
advertisement
3/9
 "आपण पहिले सांगायला पाहिजे काय नंतर व्हायचं ते होऊदेत. आता माझ्या मनात काय सुरू आहे हे मी त्याला सांगितलं पाहिजे. त्यामुळे मी नाती खूप तुटली. माझे मित्र तुटले. मित्र म्हणता नाही येणार. मी त्यांना मित्र समजत होतो. पण नाही ते तसं नसतं. ते या काही वर्षात मला ते जाणवलं."
"आपण पहिले सांगायला पाहिजे काय नंतर व्हायचं ते होऊदेत. आता माझ्या मनात काय सुरू आहे हे मी त्याला सांगितलं पाहिजे. त्यामुळे मी नाती खूप तुटली. माझे मित्र तुटले. मित्र म्हणता नाही येणार. मी त्यांना मित्र समजत होतो. पण नाही ते तसं नसतं. ते या काही वर्षात मला ते जाणवलं."
advertisement
4/9
सागर पुढे म्हणाला,
सागर पुढे म्हणाला, "आपल्याच मित्रांनी आपल्याविरोधात काही कारस्थान करावं तर ती मैत्री नाही. तुमचा वापर टिशूपेपरसारखा होत असेल. मी नंतर ठरवलं की आपण बोलूयाच नको."
advertisement
5/9
 "समोरच्याला वाईट वाटेल. मग याचा असाही समज होतो की, याचं काही नाही हा बोलत नाही काय नाही त्याला आपण व्यवस्थित फसवू शकतो. त्याच्याबरोबर राजकारण करू शकतो, असंही काही लोकांना वाटतं. त्यांना बोललं तर प्रॉब्लेम आणि नाही बोललं तरी प्रॉब्लेम आहे. हा काही करूच शकत नाही, आपण याला बरोबर जाळ्यात अडकवू शकतो. लोक आपल्याला गृहीत धरतात."
"समोरच्याला वाईट वाटेल. मग याचा असाही समज होतो की, याचं काही नाही हा बोलत नाही काय नाही त्याला आपण व्यवस्थित फसवू शकतो. त्याच्याबरोबर राजकारण करू शकतो, असंही काही लोकांना वाटतं. त्यांना बोललं तर प्रॉब्लेम आणि नाही बोललं तरी प्रॉब्लेम आहे. हा काही करूच शकत नाही, आपण याला बरोबर जाळ्यात अडकवू शकतो. लोक आपल्याला गृहीत धरतात."
advertisement
6/9
 "असे खूप अनुभव आले. आणि बरं हे अनुभव लवकर आले. कारण त्यामुळे मला शिकता आलं, आता मी पटकन माणसं ओळखतो. दोन भेटीत मी माणसं ओळखू शकतो त्याचा उद्देश काय हे मला कळतं."
"असे खूप अनुभव आले. आणि बरं हे अनुभव लवकर आले. कारण त्यामुळे मला शिकता आलं, आता मी पटकन माणसं ओळखतो. दोन भेटीत मी माणसं ओळखू शकतो त्याचा उद्देश काय हे मला कळतं."
advertisement
7/9
सागर पुढे म्हणाला,
सागर पुढे म्हणाला, "मी जसा आहे तसा एक्सेप्ट करणारी किती जण आहेत. माणूस जसा आहे तसा तो एक्सेप्ट करणं ही मैत्री आहे. तुम्ही त्यात सजेशन देऊ शकता. तुम्ही बोलू शकता, भांडू शकता, ओरडू शकता पण तुम्ही त्याला अट्टाहास करू शकत नाही."
advertisement
8/9
 "माझे या इंडस्ट्रीत आता मित्र नाहीत. मला आता चार पाच नावही येत नाहीयेत. मोजून तीन चार नाव आहेत. बाकी बाहेर धम्माल आहे. शाळेचे मित्र आजही भेटतात. मी टीव्हीवर दिसतो, लोक येतात फोटो काढतात, भेटतात, सह्या घेतात तर त्यांना त्याचं काहीच वाटत नाही."
"माझे या इंडस्ट्रीत आता मित्र नाहीत. मला आता चार पाच नावही येत नाहीयेत. मोजून तीन चार नाव आहेत. बाकी बाहेर धम्माल आहे. शाळेचे मित्र आजही भेटतात. मी टीव्हीवर दिसतो, लोक येतात फोटो काढतात, भेटतात, सह्या घेतात तर त्यांना त्याचं काहीच वाटत नाही."
advertisement
9/9
 "मी माहिमला जिथे राहायचो तिथलेही मित्र आहेत. त्यांना काही वाटत नाही. ते आधी सारखेच घालून पाडूनही बोलतात. अशी मैत्री असली पाहिजे. मला तुझ्याकडून काही नकोय, माझा स्वार्थ नाहीये, फक्त निखळ मैत्री."
"मी माहिमला जिथे राहायचो तिथलेही मित्र आहेत. त्यांना काही वाटत नाही. ते आधी सारखेच घालून पाडूनही बोलतात. अशी मैत्री असली पाहिजे. मला तुझ्याकडून काही नकोय, माझा स्वार्थ नाहीये, फक्त निखळ मैत्री."
advertisement
Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement