Rakshabandhan: महाराष्ट्रात इथं बांबूची राखी, परदेशातही मागणी, वर्षाला 27 लाखांची उलाढाल

Last Updated:
गेल्या 13 वर्षांपासून बांबूपासून राख्या बनवल्या जातात. त्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळाला आहे. तसेच त्यांच्या राख्या परदेशातही पोहचल्या आहेत. 
1/9
श्रावण महिन्यातील अनेक महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला सण म्हणजे रक्षाबंधन. श्रावणातील नारळी पौर्णिमेला बहीण-भावाच्या अतूट नात्याचा उत्सव साजरा करण्यासाठी रक्षाबंधन हा सण आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते. सद्यस्थितीमध्ये बांबूच्या राखीबाबत आकर्षण आपल्याला बघायला मिळत आहे.
श्रावण महिन्यातील अनेक महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला सण म्हणजे रक्षाबंधन. श्रावणातील नारळी पौर्णिमेला बहीण-भावाच्या अतूट नात्याचा उत्सव साजरा करण्यासाठी रक्षाबंधन हा सण आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते. सद्यस्थितीमध्ये बांबूच्या राखीबाबत आकर्षण आपल्याला बघायला मिळत आहे.
advertisement
2/9
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील धारणी तालुक्यात लवादा येथील संपूर्ण बांबू केंद्राद्वारे गेल्या 13 वर्षांपासून बांबूपासून राख्या बनवल्या जातात. त्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळाला आहे. तसेच त्यांच्या राख्या परदेशातही पोहोचल्या आहेत. 'सृष्टीबंध' या नावाने राखीचा ब्रँड संपूर्ण बांबू केंद्राच्या अध्यक्षा निरुपमा देशपांडे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील धारणी तालुक्यात लवादा येथील संपूर्ण बांबू केंद्राद्वारे गेल्या 13 वर्षांपासून बांबूपासून राख्या बनवल्या जातात. त्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळाला आहे. तसेच त्यांच्या राख्या परदेशातही पोहोचल्या आहेत. 'सृष्टीबंध' या नावाने राखीचा ब्रँड संपूर्ण बांबू केंद्राच्या अध्यक्षा निरुपमा देशपांडे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
advertisement
3/9
त्या सांगतात की, अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील लवादा गावात संपूर्ण बांबू केंद्राच्यावतीने गेल्या 30 वर्षांपासून बांबू उद्योगात आदिवासी समुदायातील लोकांना रोजगार देण्याचे काम सुरू आहे. बांबूपासून विविध वस्तू बनवून त्याचे विक्री केंद्र देखील सुरू करण्यात आले आहे. आता गेल्या 13 वर्षांपासून बांबूची राखी संपूर्ण बांबू केंद्रामध्ये बनवली जात आहे.
त्या सांगतात की, अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील लवादा गावात संपूर्ण बांबू केंद्राच्यावतीने गेल्या 30 वर्षांपासून बांबू उद्योगात आदिवासी समुदायातील लोकांना रोजगार देण्याचे काम सुरू आहे. बांबूपासून विविध वस्तू बनवून त्याचे विक्री केंद्र देखील सुरू करण्यात आले आहे. आता गेल्या 13 वर्षांपासून बांबूची राखी संपूर्ण बांबू केंद्रामध्ये बनवली जात आहे.
advertisement
4/9
आधी त्या लोकांना बांबूपासून विविध वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतर ते या बांबू केंद्रात काम करतात. राखी बनविण्याच्या कार्यात एकूण 68 लोकांचा सहभाग आहे. या बांबूपासून बनवलेल्या राखींचा एक 'सृष्टीबंध' या नावाने ब्रँड तयार केला आहे. त्या नावानेच या राख्या परदेशात पोहोचल्या आहेत. मेळघाटातील एकूण 68 लोकांना या माध्यमातून रोजगार मिळाला आहे, त्यांनी सांगितले.
आधी त्या लोकांना बांबूपासून विविध वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतर ते या बांबू केंद्रात काम करतात. राखी बनविण्याच्या कार्यात एकूण 68 लोकांचा सहभाग आहे. या बांबूपासून बनवलेल्या राखींचा एक 'सृष्टीबंध' या नावाने ब्रँड तयार केला आहे. त्या नावानेच या राख्या परदेशात पोहोचल्या आहेत. मेळघाटातील एकूण 68 लोकांना या माध्यमातून रोजगार मिळाला आहे, त्यांनी सांगितले.
advertisement
5/9
इतर राखीपेक्षा वेगळी कशी? पुढे त्या सांगतात की, मेळघाटच्या जंगलात असणाऱ्या बांबूपासून या राख्या बनवल्या जातात. अतिशय बारीक काम या राखीमध्ये केलं जातं. प्रत्येक व्यक्ती आपल्या कला कौशल्याने राखीच्या विविध आणि आकर्षक डिझाईन बनवतात. स्वतःच्या हाताने सर्वजण या राख्या तयार करतात. मार्केटमध्ये मिळणाऱ्या राखीपेक्षा ही राखी अतिशय वेगळी आणि आकर्षक असते. 30 रुपयांपासून किमतीच्या राख्या आमच्याकडे बनवल्या जातात, असेही त्यांनी सांगितले.
इतर राखीपेक्षा वेगळी कशी? पुढे त्या सांगतात की, मेळघाटच्या जंगलात असणाऱ्या बांबूपासून या राख्या बनवल्या जातात. अतिशय बारीक काम या राखीमध्ये केलं जातं. प्रत्येक व्यक्ती आपल्या कला कौशल्याने राखीच्या विविध आणि आकर्षक डिझाईन बनवतात. स्वतःच्या हाताने सर्वजण या राख्या तयार करतात. मार्केटमध्ये मिळणाऱ्या राखीपेक्षा ही राखी अतिशय वेगळी आणि आकर्षक असते. 30 रुपयांपासून किमतीच्या राख्या आमच्याकडे बनवल्या जातात, असेही त्यांनी सांगितले.
advertisement
6/9
राखी व्यवसायातून लाखोंची उलाढाल दरवर्षी संपूर्ण बांबू केंद्रामध्ये एक लाखापेक्षा जास्त राख्यांची निर्मिती होते. यावर्षी अमेरिका, जर्मनी, आयर्लंड या ठिकाणी देखील राख्यांची प्रचंड मागणी आहे. खूप दिवस आधीच त्या ठिकाणी राख्या पोहोचल्या आहेत.
राखी व्यवसायातून लाखोंची उलाढाल दरवर्षी संपूर्ण बांबू केंद्रामध्ये एक लाखापेक्षा जास्त राख्यांची निर्मिती होते. यावर्षी अमेरिका, जर्मनी, आयर्लंड या ठिकाणी देखील राख्यांची प्रचंड मागणी आहे. खूप दिवस आधीच त्या ठिकाणी राख्या पोहोचल्या आहेत.
advertisement
7/9
तसेच अमरावती, नागपूर, मुंबई अशा विविध शहरांत देखील बांबूच्या राखीची मागणी वाढतच आहे. राखीच्या व्यवसायातून संपूर्ण बांबू केंद्रात 25 ते 27 लाखांची उलाढाल होते.
तसेच अमरावती, नागपूर, मुंबई अशा विविध शहरांत देखील बांबूच्या राखीची मागणी वाढतच आहे. राखीच्या व्यवसायातून संपूर्ण बांबू केंद्रात 25 ते 27 लाखांची उलाढाल होते.
advertisement
8/9
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांनाही बांधली राखी 2018 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा ही बांबूची राखी मेळघाटमधील महिलांनी आणि मी बांधली होती. मी आणि आणखी पाच महिला ही राखी घेऊन दिल्लीला जाऊन पंतप्रधानांच्या हातावर बांबूपासून बनवलेली राखी आम्ही बांधली. तो क्षण आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा होता, असंही त्या सांगतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांनाही बांधली राखी 2018 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा ही बांबूची राखी मेळघाटमधील महिलांनी आणि मी बांधली होती. मी आणि आणखी पाच महिला ही राखी घेऊन दिल्लीला जाऊन पंतप्रधानांच्या हातावर बांबूपासून बनवलेली राखी आम्ही बांधली. तो क्षण आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा होता, असंही त्या सांगतात.
advertisement
9/9
त्याचबरोबर नितीन गडकरी यांना सुद्धा ही राखी आम्ही दरवर्षी बांधतोय. जेव्हापासून या राख्या तयार होत आहेत, तेव्हापासून दरवर्षी मी आणि पाच महिला नागपूरला जाऊन त्यांना बांबूची राखी बांधत असल्याचं देखील निरुपमा सांगतात.
त्याचबरोबर नितीन गडकरी यांना सुद्धा ही राखी आम्ही दरवर्षी बांधतोय. जेव्हापासून या राख्या तयार होत आहेत, तेव्हापासून दरवर्षी मी आणि पाच महिला नागपूरला जाऊन त्यांना बांबूची राखी बांधत असल्याचं देखील निरुपमा सांगतात.
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement