बेस्ट सेलिब्रिटी कपल जय-माहीचा Divorce! सगळं चांगलं असूनही घटस्फोट होण्याची कारणं काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Jay Bhanushali Mahhi Vij Divorce : जय-माहीसारखे कपल, बाहेरून पाहिलं तर त्यांचं आयुष्य अगदी परफेक्ट वाटतं. तरीसुद्धा अचानक घटस्फोट हा शब्द समोर येतो आणि सगळेच आश्चर्यचकित होतात. मग प्रश्न पडतो सगळं चांगलं असतानाही घटस्फोट का होतात?
अभिनेता जय आणि अभिनेत्री माही हे कपल म्हणजे बेस्ट सेलिब्रिटी कपल्सपैकी एक. ज्यांची जोडी पाहून अनेकांना कौतुक वाटतं. कित्येक लोक या सेलिब्रिटी कपलचे चाहते. पण आता त्यांनी घटस्फोट घेतला आहे. घटस्फोटाबाबत सांगतानाही त्यांनी आपण एकमेकांसाठी नेहमी असू, एकमेकांचे मित्र म्हणून राहू असं म्हटलं आहे. असं सगळं चांगलं असताना या कपलमध्ये घटस्फोट का झाला? यामागील कारण काय? हे या कपलने तसं स्पष्ट सांगितलं नाही. पण कपलमध्ये काहीच बिघडलेलं नसताना घटस्फोट का होतात यामागे काही कारणं आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
घटस्फोट हा अचानक निर्णय नसतो : बहुतेक घटस्फोट एका दिवसात होत नाहीत, एका भांडणामुळे होत नाहीत. ते अनेक प्रयत्न, अनेक गप्पा, अनेक शांत सहनशीलतेनंतर घेतलेले निर्णय असतात. तो राग नसतो, तर थकवा असतो. घटस्फोट होतो कारण लोक वाईट असतात असं नाही. घटस्फोट होतो कारण दोन चांगली माणसं एकमेकांसाठी योग्य राहात नाहीत. कधी कधी नातं टिकवणं हीच हिंमत नसते, तर नात्यातून बाहेर पडणं ही स्वतःसाठी घेतलेली गरजेची निवड असते.









