आधी की शेवटी भाजी बनवताना मीठ कधी टाकावं? अनेक गृहिणींना हे माहित नसतं

Last Updated:
बऱ्याच वेळा आपण सवयीने मीठ आधीच टाकतो, तर काहीजण जेवणाच्यामध्ये किंवा शेवटी टाकतात. पण जसं चहामध्ये साखर योग्य वेळी टाकली तरच ती परफेक्ट लागते, तसंच भाजीत मीठ योग्य वेळी टाकलं तरच त्याची खरी चव खुलते.
1/7
आपण रोज जेवणात कितीही चविष्ट पदार्थ बनवले, तरी जर त्यात मीठ नसेल, तर त्या जेवणाला काहीच स्वाद राहत नाही, मग ते कितीही चांगलं जेवण असलं तरी देखील मीठाशिवाय चवदार लागणार नाही. पण तुम्हाला माहितीय का की फक्त मीठ टाकणं पुरेसं नसतं; ते कधी आणि कसं टाकायचं हेही तितकंच महत्त्वाचं असतं. बऱ्याच वेळा आपण सवयीने मीठ आधीच टाकतो, तर काहीजण जेवणाच्यामध्ये किंवा शेवटी टाकतात. पण जसं चहामध्ये साखर योग्य वेळी टाकली तरच ती परफेक्ट लागते, तसंच भाजीत मीठ योग्य वेळी टाकलं तरच त्याची खरी चव खुलते.
आपण रोज जेवणात कितीही चविष्ट पदार्थ बनवले, तरी जर त्यात मीठ नसेल, तर त्या जेवणाला काहीच स्वाद राहत नाही, मग ते कितीही चांगलं जेवण असलं तरी देखील मीठाशिवाय चवदार लागणार नाही. पण तुम्हाला माहितीय का की फक्त मीठ टाकणं पुरेसं नसतं; ते कधी आणि कसं टाकायचं हेही तितकंच महत्त्वाचं असतं. बऱ्याच वेळा आपण सवयीने मीठ आधीच टाकतो, तर काहीजण जेवणाच्यामध्ये किंवा शेवटी टाकतात. पण जसं चहामध्ये साखर योग्य वेळी टाकली तरच ती परफेक्ट लागते, तसंच भाजीत मीठ योग्य वेळी टाकलं तरच त्याची खरी चव खुलते.
advertisement
2/7
खरं तर, जर मीठ खूप लवकर टाकलं तर भाजी लवकर शिजते आणि उशिरा टाकलं तर तिचा स्वाद अधूरा राहतो. त्यामुळे मीठ टाकण्याची योग्य वेळ हीच आपल्या स्वयंपाकाची गुणवत्ता ठरवते. चला तर पाहूया वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, ग्रेव्ही आणि डाळीत मीठ कधी टाकलं पाहिजे?
खरं तर, जर मीठ खूप लवकर टाकलं तर भाजी लवकर शिजते आणि उशिरा टाकलं तर तिचा स्वाद अधूरा राहतो. त्यामुळे मीठ टाकण्याची योग्य वेळ हीच आपल्या स्वयंपाकाची गुणवत्ता ठरवते. चला तर पाहूया वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, ग्रेव्ही आणि डाळीत मीठ कधी टाकलं पाहिजे?
advertisement
3/7
सुकी भाजी करताना मीठ कधी टाकावं?जर तुम्ही सुकी भाजी (जसे की बटाटा, कोबी, टोमॅटो इ.) करत असाल, तर सुरुवातीलाच मीठ घालावं. यामुळे भाज्यांचं कच्चेपण निघून जातं आणि त्या लवकर शिजतात. मात्र काही भाज्या जशा की भेंडी, गाजर किंवा कारले, यांना शेवटी मीठ टाकणं चांगलं असतं. त्यामुळे त्यांचा क्रंच आणि नैसर्गिक चव टिकून राहतो.
सुकी भाजी करताना मीठ कधी टाकावं?जर तुम्ही सुकी भाजी (जसे की बटाटा, कोबी, टोमॅटो इ.) करत असाल, तर सुरुवातीलाच मीठ घालावं. यामुळे भाज्यांचं कच्चेपण निघून जातं आणि त्या लवकर शिजतात. मात्र काही भाज्या जशा की भेंडी, गाजर किंवा कारले, यांना शेवटी मीठ टाकणं चांगलं असतं. त्यामुळे त्यांचा क्रंच आणि नैसर्गिक चव टिकून राहतो.
advertisement
4/7
हिवाळ्यात पालेभाज्या पालक, मेथी, सरसोंचा साग मोठ्या प्रमाणात खाल्ल्या जातात. पण या भाज्या करताना एक गोष्ट लक्षात ठेवा: शिजवताना मीठ टाकू नका. कारण त्याने पालेभाज्यांचा हिरवा रंग काळसर होतो आणि त्यांचा पौष्टिकपणा कमी होतो. या भाज्या जेव्हा सर्व्ह करणार असाल, तेव्हा शेवटी आपल्या चवीप्रमाणे मीठ घाला. त्यामुळे रंग आणि पोषण दोन्ही टिकून राहतं.
हिवाळ्यात पालेभाज्या पालक, मेथी, सरसोंचा साग मोठ्या प्रमाणात खाल्ल्या जातात. पण या भाज्या करताना एक गोष्ट लक्षात ठेवा: शिजवताना मीठ टाकू नका. कारण त्याने पालेभाज्यांचा हिरवा रंग काळसर होतो आणि त्यांचा पौष्टिकपणा कमी होतो. या भाज्या जेव्हा सर्व्ह करणार असाल, तेव्हा शेवटी आपल्या चवीप्रमाणे मीठ घाला. त्यामुळे रंग आणि पोषण दोन्ही टिकून राहतं.
advertisement
5/7
ग्रेव्हीवाली भाजी करताना मीठ कधी टाकावं?टोमॅटो-कांद्याची ग्रेव्ही असो किंवा कोणताही मसालेदार पदार्थ, ग्रेव्ही शिजवतानाच मीठ टाकणं योग्य असतं. जेव्हा तुम्ही मसाला भाजत असता, त्याचवेळी मीठ घातल्याने ग्रेव्हीचं कच्चेपण निघून जातं आणि रंगही आकर्षक दिसतो.
ग्रेव्हीवाली भाजी करताना मीठ कधी टाकावं?टोमॅटो-कांद्याची ग्रेव्ही असो किंवा कोणताही मसालेदार पदार्थ, ग्रेव्ही शिजवतानाच मीठ टाकणं योग्य असतं. जेव्हा तुम्ही मसाला भाजत असता, त्याचवेळी मीठ घातल्याने ग्रेव्हीचं कच्चेपण निघून जातं आणि रंगही आकर्षक दिसतो.
advertisement
6/7
डाळ करताना मीठ कधी टाकावं?बर्‍याच लोकांचा एक सर्वसाधारण गैरसमज आहे की, डाळ शिजवतानाच मीठ घालावं. पण हे चुकीचं आहे. कारण डाळीत प्रोटीन असतं आणि सुरुवातीला मीठ घातल्यास ती घट्ट होते आणि लवकर शिजत नाही. त्यामुळे डाळीला शिजू द्या आणि शेवटी, फोडणी देताना किंवा शेवटच्या टप्प्यात मीठ घाला. यामुळे डाळ चांगली मऊ होते आणि तिचा स्वाद टिकून राहतो.
डाळ करताना मीठ कधी टाकावं?बर्‍याच लोकांचा एक सर्वसाधारण गैरसमज आहे की, डाळ शिजवतानाच मीठ घालावं. पण हे चुकीचं आहे. कारण डाळीत प्रोटीन असतं आणि सुरुवातीला मीठ घातल्यास ती घट्ट होते आणि लवकर शिजत नाही. त्यामुळे डाळीला शिजू द्या आणि शेवटी, फोडणी देताना किंवा शेवटच्या टप्प्यात मीठ घाला. यामुळे डाळ चांगली मऊ होते आणि तिचा स्वाद टिकून राहतो.
advertisement
7/7
स्वयंपाकात मीठ हा फक्त चवीचा भाग नाही, तर वेळेचं भान ठेवणं हा त्याचा गाभा आहे. योग्य वेळी मीठ टाकल्यास तुमच्या पदार्थाची चव, रंग आणि पौष्टिकता तिन्ही वाढतात आणि मग साधं जेवणही घरगुती आणि परफेक्ट लागतं.
स्वयंपाकात मीठ हा फक्त चवीचा भाग नाही, तर वेळेचं भान ठेवणं हा त्याचा गाभा आहे. योग्य वेळी मीठ टाकल्यास तुमच्या पदार्थाची चव, रंग आणि पौष्टिकता तिन्ही वाढतात आणि मग साधं जेवणही घरगुती आणि परफेक्ट लागतं.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement