Grapes : द्राक्ष पाण्याने धुवून खाताय? मग खूप मोठी चुक करताय, ही आहे खाण्याची योग्य पद्धत
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तुमची हीच सवय तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी 'महागात' पडू शकते. कारण द्राक्षांना फक्त धुणं पुरेसं नसतं.
बाजारात सध्या रसाळ आणि गोड द्राक्षांचा सिजन सुरु झाला आहे. काळी असोत वा हिरवी, द्राक्षं दिसली की आपण ती विकत घेण्याचा मोह टाळू शकत नाही. घरी आल्यावर आपण काय करतो? नळाच्या पाण्याखाली द्राक्षांचा घड धरतो आणि लगेच खायला सुरुवात करतो. पण तुमची हीच सवय तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी 'महागात' पडू शकते. कारण द्राक्षांना फक्त धुणं पुरेसं नसतं.
advertisement
तुम्हाला माहित आहे का? द्राक्षांची शेतवड करताना त्यावर मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकांचा (Pesticides) वापर केला जातो. ही रसायनं इतकी हट्टी असतात की केवळ साध्या पाण्याने ती निघत नाहीत. डॉ. राजकुमार (आयुष तज्ज्ञ) यांच्या मते, द्राक्षांच्या पृष्ठभागावर चिकटलेले हे रासायनिक अंश पोटात गेल्यास पचनाच्या समस्यांपासून ते दीर्घकालीन गंभीर आजारांपर्यंतचा धोका निर्माण होऊ शकतो. मग आता प्रश्न असा की ही द्राक्षं सुरक्षितपणे कशी खायची? जाणून घेऊया काही प्रभावी घरगुती उपाय.
advertisement
1. साध्या पाण्याने का होत नाही सफाई?द्राक्षांवर फवारलेली कीटकनाशकं पावसाने किंवा पाण्याने वाहून जाऊ नयेत, यासाठी अनेकदा त्यात काही चिकट द्रव्ये मिसळलेली असतात. त्यामुळे तुम्ही कितीही पाणी ओतलं तरी त्यातील विषारी अंश तसेच राहतात. हे रसायन शरीरात गेल्यास ॲलर्जी, पोटदुखी किंवा उलट्या होण्याचा धोका असतो.
advertisement
2. मीठ आणि पाण्याचा चमत्कारद्राक्षं स्वच्छ करण्याचा सर्वात सोपा आणि जुना मार्ग म्हणजे मिठाचं पाणी.कसे करावे? एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात एक चमचा मीठ मिसळा. या पाण्यात द्राक्षं 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवा. मीठ बॅक्टेरिया आणि कीटकनाशकांचे थर सैल करण्यास मदत करतं. त्यानंतर स्वच्छ पाण्याने द्राक्षं पुन्हा एकदा धुवावीत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









