जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी का पिऊ नये? मोठ्यांचा 'तो' सल्ला का आहे महत्त्वाचा; जाणून घ्या वैज्ञानिक कारण
- Published by:Devika Shinde
Last Updated:
लहानपणी आपण हे ऐकलं की आपल्याला वाटतं, हे फक्त जुन्या काळचे समज असावेत. पण असं नाही. आयुर्वेदापासून ते आधुनिक विज्ञानापर्यंत, हा सल्ला अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
advertisement
advertisement
पचनक्रियेत अडथळाजांभूळ हे निसर्गात थोडे 'अम्लीय' (Acidic) आणि 'कषाय' (Astringent) असते. जेव्हा आपण जांभूळ खातो, तेव्हा आपल्या लाळेमध्ये विशिष्ट पाचक रसे मिसळली जातात. जर तुम्ही जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायले, तर हे पाचक रसे पातळ होतात. यामुळे अन्नाचे पचन नीट होत नाही आणि पोटात जडपणा जाणवू शकतो.
advertisement
गॅस आणि ॲसिडिटीचा त्रासजांभळामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि काही नैसर्गिक रसायने असतात. जांभूळ आणि पाणी यांचे मिश्रण पोटात गेल्यावर 'फरमेंटेशन' (Fermentation) म्हणजेच आंबण्याची प्रक्रिया वेगवान होऊ शकते. यामुळे पोट फुगणे, गॅस होणे किंवा अचानक ॲसिडिटी वाढणे, अशा समस्या उद्भवू शकतात. काहींना यामुळे पोटदुखीचा त्रासही होऊ शकतो.
advertisement
advertisement
रक्तातील साखरेवर परिणामजांभूळ हे मधुमेहींसाठी अमृतासारखे आहे, कारण ते रक्तातील साखर नियंत्रित करते. पण जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच जास्त पाणी प्यायल्याने चयापचय क्रिया (Metabolism) मंदावते, ज्याचा परिणाम शरीरातील इन्सुलिनच्या कामावर होऊ शकतो. जरी हा परिणाम सौम्य असला, तरी पचन नीट न झाल्यामुळे शरीराला जांभळाचे पूर्ण फायदे मिळत नाहीत.
advertisement
जांभूळ खाण्याची 'योग्य' पद्धत काय?1. मिठाचा वापर: जांभूळ नेहमी थोडे काळे मीठ किंवा सैंधव मीठ लावून खावे. यामुळे जांभळाचा कडवटपणा कमी होतो आणि पचन सुलभ होते.2. रिकाम्या पोटी टाळा : सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी जांभूळ खाणे टाळावे, कारण यामुळे ॲसिडिटी होऊ शकते.3. पाणी कधी प्यावे?: जांभूळ खाल्ल्यानंतर किमान 30 ते 45 मिनिटांनी पाणी पिणे सुरक्षित मानले जाते. यामुळे शरीर जांभळातील पोषक तत्वे नीट शोषून घेऊ शकते.4. मर्यादित प्रमाण: दिवसाला मूठभर (साधारण 50-100 ग्रॅम) जांभळं खाणं आरोग्यासाठी पुरेसं असतं.
advertisement









