Weather Alert: मराठवाड्यात वारं फिरलं, छ. संभाजीनगरसह या जिल्ह्याला यलो अलर्ट, आजचा हवामान अंदाज

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यात पावसाची तीव्रता काहीशी कमी झाली आहे. आज मात्र छत्रपती संभाजीनगरसह 2 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
1/5
राज्यात पावसाचा जोर कायम असून कोकण, घाटमाथ्यासह मराठवाड्यात जोरदार पाऊस सुरू आहे. आज 5 सप्टेंबर रोजी हवामान विभागाने मराठवाड्यातील 2 जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी केला असून जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
राज्यात पावसाचा जोर कायम असून कोकण, घाटमाथ्यासह मराठवाड्यात जोरदार पाऊस सुरू आहे. आज 5 सप्टेंबर रोजी हवामान विभागाने मराठवाड्यातील 2 जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी केला असून जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
मराठवाड्यात आज 5 सप्टेंबर रोजी हवामान विभागाने छत्रपती संभाजीनगर आणि जालना या 2 जिल्ह्यांसाठी 'येलो अलर्ट' जारी केला आहे. या काळात वातावरण ढगाळ राहणार असून विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी बरसण्याचा अंदाज आहे. वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमीपर्यंत राहील.
मराठवाड्यात आज 5 सप्टेंबर रोजी हवामान विभागाने छत्रपती संभाजीनगर आणि जालना या 2 जिल्ह्यांसाठी 'येलो अलर्ट' जारी केला आहे. या काळात वातावरण ढगाळ राहणार असून विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी बरसण्याचा अंदाज आहे. वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमीपर्यंत राहील.
advertisement
3/5
परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात साधारणतः ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर बीड, लातूर आणि धाराशिव या काही ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो. तर काही भागांमध्ये हवामान दमट व आर्द्रतेने भरलेले राहील. अचानक वाऱ्याचा वेग वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात साधारणतः ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर बीड, लातूर आणि धाराशिव या काही ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो. तर काही भागांमध्ये हवामान दमट व आर्द्रतेने भरलेले राहील. अचानक वाऱ्याचा वेग वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
4/5
जायकवाडी धरणातून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आवक सुरू आहे. त्यामुळे या वर्षी पावसाळा संपण्यापूर्वीच 100 टीएमसी (अब्ज घनफूट) क्षमता असलेल्या जायकवाडी धरणातून तब्बल 25 टीएमसी पाणी गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आले आहे. या वर्षी पावसाळ्यात 3 वेळा जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. त्याचबरोबर नांदेडमध्ये 2 वेळा गोदावरी नदीला पूर आला.
जायकवाडी धरणातून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आवक सुरू आहे. त्यामुळे या वर्षी पावसाळा संपण्यापूर्वीच 100 टीएमसी (अब्ज घनफूट) क्षमता असलेल्या जायकवाडी धरणातून तब्बल 25 टीएमसी पाणी गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आले आहे. या वर्षी पावसाळ्यात 3 वेळा जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. त्याचबरोबर नांदेडमध्ये 2 वेळा गोदावरी नदीला पूर आला.
advertisement
5/5
सतत बदलणाऱ्या हवामानात शेतीला फटका बसत आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला असला तरी काही भागात वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील काही काळ हवामानाची हीच स्थिती कायम राहणार असून पावसाचा जोर कमी होणार आहे.
सतत बदलणाऱ्या हवामानात शेतीला फटका बसत आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला असला तरी काही भागात वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील काही काळ हवामानाची हीच स्थिती कायम राहणार असून पावसाचा जोर कमी होणार आहे.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement