Rain Update: छ. संभाजीनगरच्या कन्नड, सिल्लोड अन् पैठणला अतिवृष्टीचा तडाखा; शेतकरी हवालदिल, Photo

Last Updated:
Rain Update: काही दिवसांच्या विश्रांतीनंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाने पुन्हा धुमाकूळ घातला आहे. 15 सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस झाला. नद्या-नाल्यांना पूर आला असून शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
1/10
कन्नड, सोयगाव आणि सिल्लोड तालुक्यातील गावांत मुसळधार पावसाने सोमवारी दाणादाण उडवली. छत्रपती संभाजीनगर शहरात दिवसभरात अधूनमधून रिमझिम पाऊस पडला, तर रात्री 10 वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार फटका दिला. हवामान खात्याने जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे.
कन्नड, सोयगाव आणि सिल्लोड तालुक्यातील गावांत मुसळधार पावसाने सोमवारी दाणादाण उडवली. छत्रपती संभाजीनगर शहरात दिवसभरात अधूनमधून रिमझिम पाऊस पडला, तर रात्री 10 वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार फटका दिला. हवामान खात्याने जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे.
advertisement
2/10
सोमवारी पहाटे 3 ते 6 या वेळेत सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रासह धारला, चारणेर, पेंडगाव, आमठाणा, केळगाव, घावडा परिसरात 70 मिमी पाऊस पडला. ढगफुटीसदृश्य पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले. पुलांवरून पाणी वाहिल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शेतांमध्ये पाणी शिरल्याने मका, कपाशी, सोयाबीन, मका, अद्रक या पिकांचं नुकसान झालं.
सोमवारी पहाटे 3 ते 6 या वेळेत सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रासह धारला, चारणेर, पेंडगाव, आमठाणा, केळगाव, घावडा परिसरात 70 मिमी पाऊस पडला. ढगफुटीसदृश्य पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले. पुलांवरून पाणी वाहिल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शेतांमध्ये पाणी शिरल्याने मका, कपाशी, सोयाबीन, मका, अद्रक या पिकांचं नुकसान झालं.
advertisement
3/10
सकाळी 6 वाजल्यापासून पावसाचा जोर वाढला. गावातील रस्ते जलमय झाले. चारनेर गावाला पाण्याने वेढा दिला होता. घटनांद्रा-सिल्लोड रस्ता सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बंद होता. गेल्या 20 वर्षांत असा पाऊस ग्रामस्थांनी पाहिला नसल्याचं सांगितलं. चारणा नदीच्या पुलावरून पाणी वाहत होते. नव्याने बांधलेल्या घाटनांद्रा-शेलगाव पुलावरूनही पाणी गेले. चारनेर लघु प्रकल्प तलाव शंभर टक्के भरला.
सकाळी 6 वाजल्यापासून पावसाचा जोर वाढला. गावातील रस्ते जलमय झाले. चारनेर गावाला पाण्याने वेढा दिला होता. घटनांद्रा-सिल्लोड रस्ता सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बंद होता. गेल्या 20 वर्षांत असा पाऊस ग्रामस्थांनी पाहिला नसल्याचं सांगितलं. चारणा नदीच्या पुलावरून पाणी वाहत होते. नव्याने बांधलेल्या घाटनांद्रा-शेलगाव पुलावरूनही पाणी गेले. चारनेर लघु प्रकल्प तलाव शंभर टक्के भरला.
advertisement
4/10
सिल्लोड शहरासह परिसरातील 22 गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा तालुक्यातील पालोद येथील खेळणा मध्यम प्रकल्प सोमवारी तुडुंब भरला. सकाळपासून सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाल्याने परिसर जलमय झाला आहे.
सिल्लोड शहरासह परिसरातील 22 गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा तालुक्यातील पालोद येथील खेळणा मध्यम प्रकल्प सोमवारी तुडुंब भरला. सकाळपासून सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाल्याने परिसर जलमय झाला आहे.
advertisement
5/10
पैठण तालुक्यातील दहा महसुली मंडळांतील सुमारे 84 हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महूसल प्रशासने वर्तवला आहे. रविवारी अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर सोमवारी सकाळपासूनच पंचनामे सुरू केले. तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांचे पंचानामे सुरूच असल्याची माहिती तहसीलदार ज्योती पवार यांनी दिली.
पैठण तालुक्यातील दहा महसुली मंडळांतील सुमारे 84 हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महूसल प्रशासने वर्तवला आहे. रविवारी अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर सोमवारी सकाळपासूनच पंचनामे सुरू केले. तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांचे पंचानामे सुरूच असल्याची माहिती तहसीलदार ज्योती पवार यांनी दिली.
advertisement
6/10
जायकवाडी धरण क्षेत्रात सोमवारी सकाळी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे रविवारी रात्री बंद केलेले दरवाजे सोमवारी पुन्हा चौथ्यांदा उघडण्यात आले. 18 दरवाजे साडेतीन फूटाने उघडून 66 हजार 926 क्युसेक पाणी गोदावरीत सोडलं जात आहे. शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी ही माहिती दिली.
जायकवाडी धरण क्षेत्रात सोमवारी सकाळी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे रविवारी रात्री बंद केलेले दरवाजे सोमवारी पुन्हा चौथ्यांदा उघडण्यात आले. 18 दरवाजे साडेतीन फूटाने उघडून 66 हजार 926 क्युसेक पाणी गोदावरीत सोडलं जात आहे. शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी ही माहिती दिली.
advertisement
7/10
पैठण तालुक्यात पाचोड, आडूळ, कडेठणसह विहामांडवा परिसरात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे हर्षेबुद्रुक येथील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून खरीप हंगामातील तूर, उडीद, सोयाबीन, ऊस, कापूस आणि कांदा या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नागरिकांच्या घरात तसेच रस्त्यावर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे.
पैठण तालुक्यात पाचोड, आडूळ, कडेठणसह विहामांडवा परिसरात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे हर्षेबुद्रुक येथील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून खरीप हंगामातील तूर, उडीद, सोयाबीन, ऊस, कापूस आणि कांदा या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नागरिकांच्या घरात तसेच रस्त्यावर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे.
advertisement
8/10
हर्षेबुद्रुक गावातील शेती पिकं वाहून गेली असून विहिरी देखील कोसळल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं दुहेरी नुकसान झालं. तलाठी मंडळ व महसूल विभागाने तसेच पीकविमा कंपन्यांनी लवकरात लवकर नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून पंचनामे करावेत, असं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.
हर्षेबुद्रुक गावातील शेती पिकं वाहून गेली असून विहिरी देखील कोसळल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं दुहेरी नुकसान झालं. तलाठी मंडळ व महसूल विभागाने तसेच पीकविमा कंपन्यांनी लवकरात लवकर नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून पंचनामे करावेत, असं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.
advertisement
9/10
पैठण येथील शेतकरी अंबादास फुके यांनी 1 एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली होती. जवळपास दहा ते अकरा टन तो कांदा निघाला असता. मुसळधार पावसामुळे पाण्यासोबतच कांदा वाहून गेला आहे. फुके यांना या कांदा शेतीसाठी 40 ते 50 हजार रुपयांचा खर्च लागला होता. शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
पैठण येथील शेतकरी अंबादास फुके यांनी 1 एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली होती. जवळपास दहा ते अकरा टन तो कांदा निघाला असता. मुसळधार पावसामुळे पाण्यासोबतच कांदा वाहून गेला आहे. फुके यांना या कांदा शेतीसाठी 40 ते 50 हजार रुपयांचा खर्च लागला होता. शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
advertisement
10/10
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात मुसळधार पाऊस झाला. यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झालं. शेतकऱ्यांनी शेतीसाठी केलेला खर्च देखील निघालेला नाही. त्यामुळे तात्काळ शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात मुसळधार पाऊस झाला. यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झालं. शेतकऱ्यांनी शेतीसाठी केलेला खर्च देखील निघालेला नाही. त्यामुळे तात्काळ शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement