वर्ध्यातील या ठिकाणी स्वातंत्र्याच्या 70 व्या वर्षानंतर प्रथमच झालं होतं ध्वजारोहण, जंगल सत्याग्रहाशी आहे संबंध PHOTOS
- Published by:News18 Lokmat
- local18
Last Updated:
वर्ध्यातील या गावात स्वातंत्र्याच्या 70 व्या वर्षानंतर प्रथमच ध्वज फडकाविण्यात आला होता.
वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील तळेगाव श्या.पं. हे गाव श्यामजीपंत महाराजांच्या नावाने प्रसिद्ध आहे. गावाचा लागूनच गारगोटीचा माथा आणि गावा लागत दत्तात्रय मंदिर आहे. या दत्तात्रय मंदिराच्या लगत प्रथमच 1930 नंतर 87 वर्षांनंतर आणि स्वातंत्र्याच्या 70 व्या वर्षानंतर प्रथमच ध्वज फडकाविण्यात आला होता.
advertisement
advertisement
1 आॅगस्ट 1930 रोजी तळेगाव शामजी पंत येथील गडावर 30 हजार स्वयंसेवक आणि स्वातंत्र्य संग्राम सैनिक गणपतराव टिकेकर आणि श्रीधरराव दाते यांच्या नेतृत्वात एकत्र आले. शेकडो कार्यकर्त्यांना इंग्रजांनी अटक सुद्धा केली होती. हे आंदोलन वर्धा जिल्ह्यातील सर्वात मोठे आंदोलन म्हणून राज्य गॅझेटीअर बुकमध्ये तळेगाव जंगल सत्याग्रहाची नोंद सुद्धा करण्यात आली असल्याचं सांगण्यात येते.
advertisement
advertisement
2018 यावर्षी महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक अभियान चालवलं गेलं होतं. ज्यात ज्या ज्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणी किंवा ज्या ज्या ठिकाणी स्वातंत्र्याचा लढा झालेला आहे आणि तिथे अजूनही भारतीय ध्वज फडकवला गेला नाही अशा ठिकाणांना शोधून ध्वजारोहण करण्यात यावे असे आवाहन करण्यात आले होतं.
advertisement