आजचं हवामान: नारळी पौर्णिमेला वारं फिरलं, मुंबईत घामाच्या धारा, कोकणात कोणता इशारा?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Rain: कोकणातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आज नारळी पौर्णिमेपासून पावसाचा जोर ओसरणार आहे.
कोकणात गेल्या काही दिवसांत हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आज नारळी पौर्णिमेच्या दिवशी पावसाचा जोर काहीसा कमी राहणार आहे. रत्नागिरी वगळता कोकणातील कोणत्याही जिल्ह्याला आज सतर्कतेचा इशारे देण्यात आलेला नाही. आज पावसाचा जोर कमी असला तरी दमट हवामान आणि उन्हाळ्यामुळे उकाडा जाणवेल. विशेषतः मुंबईकरांना कडक उन्हाळा सामोरा जावं लागणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
advertisement
advertisement
पालघर जिल्ह्यात आज हवामान ढगाळ राहील आणि दिवसभर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील. सकाळी आणि दुपारच्या सुमारास थोडा पाऊस अपेक्षित असून संध्याकाळी काही भागात पावसाचा जोर कमी होईल. दमट हवामानामुळे उकाडा जाणवणार आहे. समुद्रकिनाऱ्याजवळच्या भागात आर्द्रता अधिक राहणार असल्याने उकाड्याचा त्रास जास्त जाणवेल.
advertisement