Mumbai Weather : मुंबईत पावसाची विश्रांती, आता पुन्हा नवसंकट, हवामान खात्याकडून अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Weather: ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने ब्रेक घेतल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय.
श्रावण महिना सुरू होऊन आता आठवड्याहून अधिक काळ लोटला असतानाही कोकण किनारपट्टीवर पावसाने अद्याप ठोस हजेरी लावलेली नाही. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने ब्रेक घेतल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे. गेले काही दिवस मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि रत्नागिरीसारख्या कोकणातील महत्त्वाच्या शहरांमध्ये केवळ हलक्या ते मध्यम सरी पडतायत. मुसळधार पावसाचे प्रमाण मात्र कमीच आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय.
advertisement
मुंबई शहरात आज ढगाळ वातावरण असून काही भागांमध्ये सकाळी आणि दुपारी हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. कमाल तापमान 30 अंश सेल्सियसच्या आसपास राहण्याची शक्यता असून किमान तापमान 26 अंश सेल्सियसपर्यंत जाऊ शकते. पावसाचा जोर कमी असल्याने वाहतूक सेवा सुरळीत सुरू राहील, मात्र उष्णता आणि आर्द्रतेमुळे दमट हवामान जाणवेल.
advertisement
advertisement
advertisement
रत्नागिरी आणि कोकणातील इतर भागांमध्ये ढगाळ वातावरण असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार काही भागांमध्ये दुपारनंतर पावसाच्या सरींमध्ये थोडीशी वाढ होऊ शकते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये कमाल तापमान 27 अंश, तर किमान तापमान 24 अंश सेल्सियसपर्यंत राहण्याची शक्यता आहे.


