स्पर्धा परिक्षेत 16 वेळा नापास, पण न खचता सुरू केला व्यवसाय, आज अनेकांसाठी प्रेरणा बनला हा व्यक्ती
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते आणि स्पर्धा परिक्षेची तयारी करणारा प्रत्येक उमेदवार त्यासाठी अहोरात्र मेहनत देखील करतो. मात्र, अनेक वेळा प्रयत्न करूनही काही जणांना यश मिळतो. त्यामुळे काही जण खचून जातात आणि ते स्वप्नपूर्तीसाठी चालत असलेली वाट अर्धवट सोडून देतात. तर काही जण आपली वेगळी वाट निवडतात आणि त्यात यशस्वी होतात. आज अशाच व्यक्तीची कहाणी आपण जाणून घेणार आहोत. (प्राची केदारी/पुणे, प्रतिनिधी)
ज्ञानेश्वर घाडगे, असे या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी जवळपास 9 वर्ष महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC परीक्षेचा अभ्यास केला. 16 वेळा मुख्य परीक्षा दिली. मात्र, तरीसुद्धा त्यांना त्यात अपयश आले. त्यानंतर ज्ञानेश्वर यांनी मागील 2 वर्षा पासून हॉस्टेलच्या व्यवसायाला सुरुवात केली. आता त्यांनी जवळपास 7 हॉस्टेल सुरू केले आहेत. त्यांच्या या प्रवासाबाबत लोकल18 च्या टीमने त्यांच्याशी संवाद साधला.
advertisement
advertisement
advertisement
सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्यातील माझं एक छोटस गाव आहे. माझी आई आणि भाऊ शेती करतात तर वडील पतसंस्थेमध्ये काम करत होते. एमपीएससी करण्यासाठी 2012 मध्ये पुण्याला आलो. मग एमपीएससीची परीक्षा खूप वेळा दिली. मात्र, खूप वेळा प्रयत्न करून अपयश आले. तेव्हा प्रथम 2022 मध्ये हॉस्टेलच्या व्यवसायाला सुरुवात केली.
advertisement
advertisement
advertisement