Weather Alert: महाराष्ट्र आता तापणार, आग ओकणारं संकट; 3 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात होळीनंतर मोठे बदल जाणवत आहेत. 3 जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे.
होळीनंतर महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. तापमानाचा पारा चांगला चढला असून काही ठिकाणी तापमान 38 अंशांच्या वर गेले आहे. तर 5 मार्च रोजी कोकणतील पालघर, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांत उष्ण आणि आद्र हवामान राहणार असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण ते विदर्भ गुरुवारचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
कोकणात वारं फिरल्याचं चित्र असून हवामान मुख्यत्वे कोरडं, उष्ण आणि उष्ण-आद्र जाणवत आहे. उत्तर कोकणचा पारा चांगलाच चढला आहे. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांना उष्ण-आद्र हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईत देखील कमाल तापमान 37 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आद्रता जास्त असल्याने अस्वस्थता जाणवेल. गुरुवारी पावसाची कोणतीही शक्यता नाही.
advertisement
मध्य महाराष्ट्रात कोरडे आणि उष्ण हवामान राहील. पुण्यासह सोलापूर कोल्हापूर, सातारा आणि सांगलीत कमाल तापमानाचा पारा 34-37 अंशांवर राहील. तर किमान तापमान 20-23 अंशांवर राहील. गुरुवारी दक्षिण मध्य महाराष्ट्रात अंशत: ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असली तरी पावसाचा अंदाज नाही. तापमान सामान्यापेक्षा जास्त राहील.
advertisement
advertisement
advertisement
advertisement









