आज हनुमान जयंती! मारुती स्तोत्राचे पठण पालटणार नशीब, कधी, कसं आणि किती वेळा करावं?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
चैत्र पौर्णिमेच्या या पावन मुहूर्तावर संकटमोचन हनुमानाची उपासना केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्रात विशेषतः समर्थ रामदास स्वामी रचित 'मारुती स्तोत्राला' अनन्यसाधारण महत्त्व आहे.
चैत्र पौर्णिमेच्या या पावन मुहूर्तावर संकटमोचन हनुमानाची उपासना केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्रात विशेषतः समर्थ रामदास स्वामी रचित 'मारुती स्तोत्राला' अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे मानले जाते की, मारुती स्तोत्राचे शास्त्रोक्त पद्धतीने केलेले पठण केवळ भीती दूर करत नाही, तर मनुष्याचे नशीब पालटण्याची ताकद ठेवते.
advertisement
advertisement
advertisement
किती वेळा करावे पठण?: सामान्यतः दिवसातून एकदा मारुती स्तोत्र म्हणणे शुभ असते. मात्र, जर तुम्ही एखाद्या विशिष्ट संकटात असाल किंवा तुमची एखादी इच्छा प्रदीर्घ काळ प्रलंबित असेल, तर आजच्या दिवशी 11, 21 किंवा 108 वेळा स्तोत्र पठण करण्याचा संकल्प करावा. 'भीमरूपी महारुद्रा'चे अकरावे पठण पूर्ण झाल्यावर मारुतीराया प्रसन्न होतात, असे समर्थ रामदास स्वामींनी स्तोत्राच्या शेवटी नमूद केले आहे.
advertisement
advertisement
advertisement
फळ आणि लाभ: मारुती स्तोत्राच्या नियमित पठणाने शरीरातील रोगराई दूर होते, भीती नष्ट होते आणि बुद्धीची प्रगल्भता वाढते. विशेषतः ज्यांना शनीची साडेसाती सुरू आहे, त्यांच्यासाठी हे स्तोत्र एक 'सुरक्षा कवच' म्हणून काम करते. आजच्या दिवशी केलेले पठण तुमच्या प्रगतीतील सर्व अडथळे दूर करणारे ठरेल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)









