Makar Sankranti : दरवर्षी मकर संक्रांती एकाच तारखेला का? कॅलेंडरच आहे खरं कारण

Last Updated:
हिंदू संस्कृतीतील मकर संक्रांती हा एकमेव असा सण आहे जो तारीख फार बदलत नाही.
1/7
सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांती असे म्हटले जाते. प्रत्येक महिन्यात सूर्य एक रास बदलतो. मकर संक्रांतीच्या दिवशीच सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून याला मकर संक्रांती म्हणतात.
सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांती असे म्हटले जाते. प्रत्येक महिन्यात सूर्य एक रास बदलतो. मकर संक्रांतीच्या दिवशीच सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून याला मकर संक्रांती म्हणतात.
advertisement
2/7
फेब्रुवारीमध्ये कुंभ संक्रांत असते. मार्चमध्ये मीन, एप्रिलमध्ये मेष, मग वृषभ असा संक्रांतीचा क्रम असतो. तरीही मकर संक्रांती साजरी का साजरी केली जाते? याबाबत पुणे येथील ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी माहिती दिली आहे.
फेब्रुवारीमध्ये कुंभ संक्रांत असते. मार्चमध्ये मीन, एप्रिलमध्ये मेष, मग वृषभ असा संक्रांतीचा क्रम असतो. तरीही मकर संक्रांती साजरी का साजरी केली जाते? याबाबत पुणे येथील ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी माहिती दिली आहे.
advertisement
3/7
मकर संक्रांती हा हिंदू संस्कृतीतील एकमेव असा सण आहे जो तारीख फार बदलत नाही. याचे कारण म्हणजे तो सूर्याच्या कॅलेंडरनुसार व बाकी सर्व सण हे चंद्र कॅलेंडरवर (चंद्राच्या स्थानावर) आधारलेले असतात. सोलर सायकल ही दर 8 वर्षांनी एकदा बदलते. याआधी 2016 मध्ये संक्रांत 15 जानेवारी रोजी होती.
मकर संक्रांती हा हिंदू संस्कृतीतील एकमेव असा सण आहे जो तारीख फार बदलत नाही. याचे कारण म्हणजे तो सूर्याच्या कॅलेंडरनुसार व बाकी सर्व सण हे चंद्र कॅलेंडरवर (चंद्राच्या स्थानावर) आधारलेले असतात. सोलर सायकल ही दर 8 वर्षांनी एकदा बदलते. याआधी 2016 मध्ये संक्रांत 15 जानेवारी रोजी होती.
advertisement
4/7
मकर संक्रांतीला शास्त्रीय महत्त्व आहे. या दिवसाच्या काही काळ आधी रात्र मोठी असते आणि दिवस लहान असतो. मकर संक्रांती नंतर रात्री लहान दिवस मोठा होत जातो. तसेच संक्रांतीनंतर ऋतूबदल होण्यास सुरुवात होते. हवेतील गारवा कमी होऊन उष्णता वाढायला लागते. उत्तरायण जरी सुरू झाले असले तरी सुरवातीला काही दिवस थंडी राहाते व नंतर उन्हाळा सुरु होतो.
मकर संक्रांतीला शास्त्रीय महत्त्व आहे. या दिवसाच्या काही काळ आधी रात्र मोठी असते आणि दिवस लहान असतो. मकर संक्रांती नंतर रात्री लहान दिवस मोठा होत जातो. तसेच संक्रांतीनंतर ऋतूबदल होण्यास सुरुवात होते. हवेतील गारवा कमी होऊन उष्णता वाढायला लागते. उत्तरायण जरी सुरू झाले असले तरी सुरवातीला काही दिवस थंडी राहाते व नंतर उन्हाळा सुरु होतो.
advertisement
5/7
या काळामध्ये मुंज, लग्न कार्य होतात. हा देवांचा दिवस मानला जातो. देवांचा दिवस संपल्यानंतर रात्र सुरु असते. त्यानंतर मकर संक्रात सुरु होते. सण साजरा करताना ऋतूमानामध्ये बदल होतो. त्या अनुषंगाने काही दानधर्म सांगितले आहेत. संक्रांत हा थंडीचा अतिउच्च काळ असतो. त्यामुळे या काळात तीळ भक्षण करणं शरीरासाठी महत्वाच सांगितलं आहे, असेही मारटकर सांगतात.
या काळामध्ये मुंज, लग्न कार्य होतात. हा देवांचा दिवस मानला जातो. देवांचा दिवस संपल्यानंतर रात्र सुरु असते. त्यानंतर मकर संक्रात सुरु होते. सण साजरा करताना ऋतूमानामध्ये बदल होतो. त्या अनुषंगाने काही दानधर्म सांगितले आहेत. संक्रांत हा थंडीचा अतिउच्च काळ असतो. त्यामुळे या काळात तीळ भक्षण करणं शरीरासाठी महत्वाच सांगितलं आहे, असेही मारटकर सांगतात.
advertisement
6/7
मकर संक्रात म्हणजे काय तर सूर्य मकर राशीत प्रवेश करण्याचा एक क्षण आहे. 12 राशी मध्ये विशेष करून भारताला मकर राशीतल सूर्याचं भ्रमन हे महत्वाचं ठरतं. भौगोलिक स्तिथी जर पाहिली तर मकर राशीतला सूर्य प्रवेश म्हणजे उत्तरायण सुरु होतं. धर्म शास्त्रात उत्तरायणला विशेष महत्व आहे. सहा महिन्याचं उत्तरायण हे 21 डिसेंबर ते 21 जून असं असतं. या सहा महिन्यांचं शुभ कार्यासाठी महत्वाचं सांगितलं आहे.
मकर संक्रात म्हणजे काय तर सूर्य मकर राशीत प्रवेश करण्याचा एक क्षण आहे. 12 राशी मध्ये विशेष करून भारताला मकर राशीतल सूर्याचं भ्रमन हे महत्वाचं ठरतं. भौगोलिक स्तिथी जर पाहिली तर मकर राशीतला सूर्य प्रवेश म्हणजे उत्तरायण सुरु होतं. धर्म शास्त्रात उत्तरायणला विशेष महत्व आहे. सहा महिन्याचं उत्तरायण हे 21 डिसेंबर ते 21 जून असं असतं. या सहा महिन्यांचं शुभ कार्यासाठी महत्वाचं सांगितलं आहे.
advertisement
7/7
संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते. त्याचे कारण म्हणजे सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतो. यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दार उघडते. म्हणूनच या दिवशी केलेले पुण्य व दान हे इतर दिवशी केलेल्या दानापेक्षा अधिक फलदायी असते, असे ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर सांगतात. (प्राची केदारी, प्रतिनिधी)
संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते. त्याचे कारण म्हणजे सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतो. यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दार उघडते. म्हणूनच या दिवशी केलेले पुण्य व दान हे इतर दिवशी केलेल्या दानापेक्षा अधिक फलदायी असते, असे ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर सांगतात. (प्राची केदारी, प्रतिनिधी)
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement