महादेवाचा कडक उपवास केला तरी अपूर्ण राहतील इच्छा, जर महाशिवरात्रीला खाल्लं नाही 'हे' फळ; का आहे महत्त्वाचं?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
महाशिवरात्रीचा सण म्हटला की उपवास, रुद्राभिषेक, बेलपत्र आणि हमखास बाजारात दिसणारे फळ म्हणजे 'कवठ'. भगवान शंकराच्या पूजेत कवठाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
advertisement
advertisement
advertisement
तसेच, महाशिवरात्रीचा काळ हा ऋतू परिवर्तनाचा काळ असतो. या काळात थंडी संपून उन्हाळ्याची चाहूल लागते. आयुर्वेदानुसार, या काळात शरीरातील उष्णता वाढू लागते आणि पित्तदोष निर्माण होऊ शकतो. कवठ हे प्रकृतीने थंड आणि पित्तशामक असल्याने, बदलत्या ऋतूत शरीराचे संतुलन राखण्यासाठी महाशिवरात्रीच्या निमित्ताने हे फळ खाण्याची परंपरा सुरू झाली.
advertisement
advertisement
advertisement
महाशिवरात्रीच्या दिवशी शिवभक्त शंकराची आराधना करून देवाची मनोभावे पुजा करतात. महादेवाला कवठ खूप आवडते, त्यामुळे महाशिवरात्रीला याचाच नैवेद्य दाखवला जातो. भक्तांनाही कवठ प्रसाद म्हणून दिली जाते. कवठाशिवाय महाशिवरात्री सण पूर्ण होतच नाही अशी मान्यता आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)










