advertisement

PAK vs IND : पावसामुळे मॅच रद्द झाली तर सुपर 8 मध्ये कोण पोहोचणार? भारत की पाकिस्तान? पाहा रोमांचक समीकरण

Last Updated:
India vs Pakistan Rain Prediction : श्रीलंकेच्या हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे रविवारी हवामानात मोठे बदल होऊन भारत पाकिस्तान सामन्यावर पावसाची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
1/7
भारत पाकिस्तान सामन्यावर पावसाचं सावट आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा थरार संध्याकाळी 7 वाजता म्हणजे मॅच सुरू होण्यापूर्वीच्या काळात वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
भारत पाकिस्तान सामन्यावर पावसाचं सावट आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा थरार संध्याकाळी 7 वाजता म्हणजे मॅच सुरू होण्यापूर्वीच्या काळात वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
advertisement
2/7
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 15 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजेपर्यंत आकाश निरभ्र राहील, परंतु त्यानंतर पावसाचे आगमन होऊ शकते. त्यामुळे मॅचच्या सुरूवातीलाच पाऊस सामन्यात खोडा घालू शकतो.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 15 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजेपर्यंत आकाश निरभ्र राहील, परंतु त्यानंतर पावसाचे आगमन होऊ शकते. त्यामुळे मॅचच्या सुरूवातीलाच पाऊस सामन्यात खोडा घालू शकतो.
advertisement
3/7
रात्री 8 नंतर हवामान पुन्हा सुधारू शकते, असंही भाकीत वर्तवण्यात आलं आहे. त्यामुळे हा सामना पूर्णपणे रद्द होणार नाही, मात्र पावसामुळे ओव्हरची कपात किंवा पावसामुळे खेळात वारंवार अडथळे येण्याची चिन्हे दिसत आहेत.
रात्री 8 नंतर हवामान पुन्हा सुधारू शकते, असंही भाकीत वर्तवण्यात आलं आहे. त्यामुळे हा सामना पूर्णपणे रद्द होणार नाही, मात्र पावसामुळे ओव्हरची कपात किंवा पावसामुळे खेळात वारंवार अडथळे येण्याची चिन्हे दिसत आहेत.
advertisement
4/7
कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर पाऊस थांबल्यानंतर अवघ्या 45 ते 60 मिनिटांत मैदान पुन्हा खेळण्यायोग्य करण्याची क्षमता येथील कर्मचाऱ्यांकडे आहे. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. मात्र पाकिस्तानला टेन्शन आलंय.
कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर पाऊस थांबल्यानंतर अवघ्या 45 ते 60 मिनिटांत मैदान पुन्हा खेळण्यायोग्य करण्याची क्षमता येथील कर्मचाऱ्यांकडे आहे. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. मात्र पाकिस्तानला टेन्शन आलंय.
advertisement
5/7
जर पावसामुळे सामना रद्द करण्याची वेळ आली, तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण दिला जाईल. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजसाठी कोणताही 'रिजर्व डे' ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे पाकिस्तानची चांगलीत तारांबळ उडालीये.
जर पावसामुळे सामना रद्द करण्याची वेळ आली, तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण दिला जाईल. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजसाठी कोणताही 'रिजर्व डे' ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे पाकिस्तानची चांगलीत तारांबळ उडालीये.
advertisement
6/7
सध्या गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानी असून पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघांचे प्रत्येकी 4 गुण असले तरी भारताचा रन रेट पाकिस्तानपेक्षा बराच चांगला आहे, ज्यामुळे भारताचे पारडं जड मानलं जात आहे.
सध्या गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानी असून पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघांचे प्रत्येकी 4 गुण असले तरी भारताचा रन रेट पाकिस्तानपेक्षा बराच चांगला आहे, ज्यामुळे भारताचे पारडं जड मानलं जात आहे.
advertisement
7/7
दरम्यान, जर भारताविरूद्धचा सामना पावसामुळे किंवा काही कारणास्तव झाला नाही आणि ड्रॉ झाला तर पाकिस्तानला सुपर 8 मध्ये पोहोचण्यासाठी काहीही करून नेदरलँडला अखेरच्या सामन्यात हरवावच लागेल.
दरम्यान, जर भारताविरूद्धचा सामना पावसामुळे किंवा काही कारणास्तव झाला नाही आणि ड्रॉ झाला तर पाकिस्तानला सुपर 8 मध्ये पोहोचण्यासाठी काहीही करून नेदरलँडला अखेरच्या सामन्यात हरवावच लागेल.
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement