Alcohol Facts : दारू प्यायल्यावर भिगी बिल्लीही बनते शेर! दारूत असं असतं तरी काय?

Last Updated:
Alcohol Facts : अनेक लोकांचा असा विश्वास आहे की आत्मविश्वासाच्या कमतरतेवर मात करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे दारूचे काही घोट. पण दारू खरोखरच एखाद्या व्यक्तीला आत्मविश्वास देते का?
1/7
तुम्ही पाहिलं असेल दारू प्यायल्यानंतर मनातील बऱ्याच गोष्टी बाहेर येतात. जो माणूस कधीच बोलत नाही किंवा मनातील काही व्यक्त करू शकत नाही तो दारू प्यायल्यानंतर धडाधडा बोलू लागतो. भित्रा माणूसही वाघ बनतो, त्यामुळे फिल्ममध्येही तुम्ही असे सीन पाहिले असतील की काही सांगायचं झालं की हिरो दारू पितो. पण हे कसं काय होतं? दारूत असं काय असतं?
तुम्ही पाहिलं असेल दारू प्यायल्यानंतर मनातील बऱ्याच गोष्टी बाहेर येतात. जो माणूस कधीच बोलत नाही किंवा मनातील काही व्यक्त करू शकत नाही तो दारू प्यायल्यानंतर धडाधडा बोलू लागतो. भित्रा माणूसही वाघ बनतो, त्यामुळे फिल्ममध्येही तुम्ही असे सीन पाहिले असतील की काही सांगायचं झालं की हिरो दारू पितो. पण हे कसं काय होतं? दारूत असं काय असतं?
advertisement
2/7
जेव्हा दारू शरीरात जाते तेव्हा ते मेंदूतील न्यूरोट्रांसमीटर किंवा रसायनांचं संतुलन बिघडवतं. यातील सर्वात महत्त्वाचे रसायन म्हणजे GABA (Gamma-Aminobutyric Acid). अल्कोहोल GABA सारखे कार्य करते आणि मेंदूची क्रिया मंदावतं, ज्यामुळे आराम मिळतो, ताण कमी होतो आणि सुरक्षिततेची खोटी भावना निर्माण होते. म्हणूनच बरेच लोक म्हणतात,
जेव्हा दारू शरीरात जाते तेव्हा ते मेंदूतील न्यूरोट्रांसमीटर किंवा रसायनांचं संतुलन बिघडवतं. यातील सर्वात महत्त्वाचे रसायन म्हणजे GABA (Gamma-Aminobutyric Acid). अल्कोहोल GABA सारखे कार्य करते आणि मेंदूची क्रिया मंदावतं, ज्यामुळे आराम मिळतो, ताण कमी होतो आणि सुरक्षिततेची खोटी भावना निर्माण होते. म्हणूनच बरेच लोक म्हणतात, "एकच प्यायल्यानंतर सर्व भीती नाहीशी होते."
advertisement
3/7
अल्कोहोलचे परिणाम एवढ्यावरच थांबत नाहीत. ती मेंदूच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सवर देखील परिणाम करते, हाच भाग आपल्याला तर्क करण्यास, नियंत्रित करण्यास आणि बुद्धिमान निर्णय घेण्यास मदत करतो.
अल्कोहोलचे परिणाम एवढ्यावरच थांबत नाहीत. ती मेंदूच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सवर देखील परिणाम करते, हाच भाग आपल्याला तर्क करण्यास, नियंत्रित करण्यास आणि बुद्धिमान निर्णय घेण्यास मदत करतो.
advertisement
4/7
जेव्हा मन शांत होतं, तेव्हा संकोच आणि भीती कमी होतात आणि पूर्वी कठीण वाटणारी कामं सोपी होतात. म्हणूनच मद्यपी लोक अधिक मोकळेपणाने बोलतात, मोठ्याने हसतात आणि कधीकधी असं काही बोलतात जे ते शांत असताना कधीही बोलू शकत नाहीत.
जेव्हा मन शांत होतं, तेव्हा संकोच आणि भीती कमी होतात आणि पूर्वी कठीण वाटणारी कामं सोपी होतात. म्हणूनच मद्यपी लोक अधिक मोकळेपणाने बोलतात, मोठ्याने हसतात आणि कधीकधी असं काही बोलतात जे ते शांत असताना कधीही बोलू शकत नाहीत.
advertisement
5/7
याशिवाय अल्कोहोल डोपामाइन नावाचं हॅप्पी हार्मोन्स वाढवतो, ज्यामुळे व्यक्ती आनंदी, आत्मविश्वासू आणि समाधानी होते. या क्षणी त्यांना अत्यंत सकारात्मक आणि निर्भय वाटतं जणू ते काहीही करू शकतात.
याशिवाय अल्कोहोल डोपामाइन नावाचं हॅप्पी हार्मोन्स वाढवतो, ज्यामुळे व्यक्ती आनंदी, आत्मविश्वासू आणि समाधानी होते. या क्षणी त्यांना अत्यंत सकारात्मक आणि निर्भय वाटतं जणू ते काहीही करू शकतात.
advertisement
6/7
पण हा आत्मविश्वास खरा नाही. अल्कोहोलचे परिणाम कमी होतात, डोपामाइनची पातळी कमी होते, GABA अॅक्टिव्हिटी सामान्य होते आणि मेंदू त्याच्या सामान्य स्थितीत परत येतो. नंतर अनेक लोकांना कळतं की ते दारू पिऊन जे काही बोलले किंवा केलं तो खरा आत्मविश्वास नव्हे, तर रासायनिक असंतुलनाचा परिणाम होता.
पण हा आत्मविश्वास खरा नाही. अल्कोहोलचे परिणाम कमी होतात, डोपामाइनची पातळी कमी होते, GABA अॅक्टिव्हिटी सामान्य होते आणि मेंदू त्याच्या सामान्य स्थितीत परत येतो. नंतर अनेक लोकांना कळतं की ते दारू पिऊन जे काही बोलले किंवा केलं तो खरा आत्मविश्वास नव्हे, तर रासायनिक असंतुलनाचा परिणाम होता.
advertisement
7/7
सूचना : हा लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे जो फक्त माहितीसाठी देण्यात आला आहे. दारू आरोग्यासाठी वाईट आहे. दारूचं समर्थन किंवा त्यासाठी प्रोत्साहन देण्याचा उद्देशन न्यूज18मराठीचा नाही.
सूचना : हा लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे जो फक्त माहितीसाठी देण्यात आला आहे. दारू आरोग्यासाठी वाईट आहे. दारूचं समर्थन किंवा त्यासाठी प्रोत्साहन देण्याचा उद्देशन न्यूज18मराठीचा नाही.
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement