...याच्यापुढे मालदीव आणि लक्षद्वीपपण फिकं! डोळे दिपवणारं सौंदर्य, म्हणतात 100 बेटांचं शहर
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
समुद्री पर्यटनासाठी भारतात मालदीवपेक्षाही अतिशय सुंदर बेट आहेत हे लक्षद्वीपवरून आपल्या लक्षात आलंच असेल. अशाच एका नैसर्गिक सौंदर्याने संपन्न पर्यटनस्थळाविषयी आपण जाणून घेणार आहोत. जिथं प्रचंड पाऊस पडल्याने वर्षभर हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात राहतं येतं आणि गार वारा अनुभवता येतो.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिली आणि या आकर्षक बेटांची संपूर्ण जगात चर्चा झाली. लक्षद्वीपची तुलना थेट मालदीवशी करण्यात आली, जिथं दरवर्षी लाखो रुपये खर्चून देश-विदेशातील पर्यटक निवांत वातावरण अनुभवायला जातात. परंतु आपल्या भारतातही अशी अनेक पर्यटनस्थळं आहेत जिथं भेट दिल्यावर आपल्याला अगदी स्वर्गसुख अनुभवल्याचा आनंद मिळेल. अशाच एका शहराची ही माहिती आहे. जे राजस्थान राज्यात तब्बल 100 बेटांवर वसलंय.
advertisement
राजस्थानच्या 'बांसवाडा' भागाची कायमच सोशल मीडियावर चर्चा असते. त्याचं कारणच आहे तिथलं सौंदर्य. खरंतर राजस्थान म्हटलं की, डोळ्यासमोर येतो दूरदूरवर पसरलेला अखंड वाळवंट. अशा या वाळवंटी भागात असलेल्या बांसवाडात मात्र वर्षाचे बाराही महिने दाट हिरवळ असते. इथं बेटांच्या रूपात लहान लहान गावं वसलेली आहेत.
advertisement
advertisement
advertisement