NPC : अजितदादा नेहमीच खरं आणि योग्य बोलतात, जयंत पाटील नेमकं असं का म्हणाले?
- Published by:Rahul Punde
Last Updated:
NPC : अजित पवार आणि काही आमदार सत्तेत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कोणाचा? असा वाद निर्माण झाला आहे. यावरुन शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.
पुणे, 30 सप्टेंबर (चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका शिवसेना पक्षावर दावा केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने सुनावणी घेत पक्ष आणि निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले होते. आता असाच पेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत निर्माण झाला आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट दोन्ही गट पक्षावर आपापला दावा दाखल करत आहेत. दरम्यान, यावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांचं कौतुक केलं आहे. अजितदादा नेहमीच खरं आणि योग्य बोलतात, असं जयंत पाटील म्हणाले. ते पुण्यात बोलत होते
निवडणूक आरोप आमचं ऐखत नाही : जयंत पाटील
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले, की पवार साहेबांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं होतं की आमची बाजू ऐकून घ्या. सहा ऑक्टोबरला सुनावणी होत आहे. आमची बाजू योग्य रीतीने मांडू. निवडणूक आयोग आमची बाजू ऐकून घेत नाहीये. भारताच्या इतिहासात जे संस्थापक अध्यक्ष असतात त्यांचाच पक्ष असतो. पण काही लोक पक्ष आमच्या ताब्यात आला असल्याचे अविर्भावात आहेत. राज्यात आणि देशात राजकीय पक्ष पळवण्याची आणि चोरण्याची पद्धत नव्याने सुरू झाली आहे. निवडणूक आयोग सुजाण असून योग्य तो निर्णय घेईल, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
advertisement
काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्यावर बोलताना पाटील म्हणाले की त्या व्हिडिओमध्ये अजित पवार असं सांगत आहेत की मनसेचा एक सदस्य गेला तर मनसे पक्ष त्याच्यासोबत जाईल का? आणि अजित पवारांचं हे विधान योग्यच आहे. अजित पवार नेहमीच खरं आणि योग्य बोलतात. अजित पवारांची भूमिका देखील निवडणूक आयोगाने लक्षात घ्यावी.
advertisement
ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये ही भूमिका सर्वांचीच : पाटील
मंत्रालयात जी आकडेवारी भुजबळ यांनी मांडली असेल ती लक्षात घ्यावी. सरकार खरच ओबीसीवर अन्याय करत आहे. सरकारने ओबीसींवर अन्याय करू नये हीच भूमिका भुजबळ यांनी मांडली असावी. मंत्रालयात ओबीसींची संख्या कमी आहे असं मला देखील वाटतं. देशात जातीनिहाय सर्वेक्षण व्हायला पाहिजे हीच आमची मूळ मागणी आहे.
advertisement
भाजप अनेक आमदारांना खासदारकीचं तिकीट देणार असल्याच्या बातम्या आहेत. महाराष्ट्रात जे नेते नको वाटतात त्यांना दिल्लीला पाठवण्याची प्रथा भाजपात आहे. त्यातलाच हा एक भाग असल्याची टीका पाटील यांनी केली.
महाराष्ट्रात प्रचंड बेकारी आहे, लाखो तरुण बेरोजगार आहेत. सरकार असे नको ते उद्योग करत आहे. नायब तहसीलदार कंत्राटी पद्धतीने भरणं चुकीचं आहे. पदाचा दुरुपयोग होईल. मला असं वाटतं आता राज्य सरकारचं कॉन्ट्रॅक्ट वर द्यायला काही हरकत नाही.
advertisement
आमदार सुमन पाटील आंदोलन..
याआधी त्या गावांना पाणी देण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. पण नव्या सरकारने त्यावर स्थगिती आणली. सुमन ताईंना त्याचं श्रेय जाईल म्हणून हा निर्णय सरकारने रद्द केला. सरकारला याबाबतीत विनंती करून देखील सरकार काम करत नाही म्हणून त्या उपोषण करणार आहेत. राज्यातल्या महिला आमदारांना उपोषण करावं लागणं हे तर सरकारची अकार्यक्षमता असल्याची टीका पाटील यांनी केली.
advertisement
आमदार अपात्रतेबाबत लवकर निर्णय व्हायला हवा. आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लागतील. या सर्व आमदारांना पैलतीरी पोहोचवण्याचं काम राहुल नार्वेकर करत आहेत. हे ठरवून केलं जात आहे का? असं विचारलं असता पाटील म्हणाले, की राहुल नार्वेकर योग्य तो निर्णय करतील पण त्यांनी निर्णय लवकर घ्यावा हीच आमची अपेक्षा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 30, 2023 3:43 PM IST