advertisement

लिंबू मिरची फ्रिजमध्ये एकत्र ठेवता? मग तुम्ही मोठी चुक करताय; देवकीनंदन ठाकूर यांनी सांगितलं कारण, पाहा VIDEO

Last Updated:

तुम्हाला माहीत आहे का? ही एक छोटीशी सवय तुमच्या घरात कटकटी आणि अशांतीचं कारण ठरू शकते. प्रसिद्ध कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांनी नुकत्याच एका प्रवचनात याविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : आपल्या घराचा किचन हा केवळ जेवण बनवण्याची जागा नसून, तो सकारात्मक ऊर्जेचा केंद्रबिंदू मानला जातो. स्वयंपाकघरातील प्रत्येक वस्तूची मांडणी कशी असावी, यावर घरातील सुख-शांती अवलंबून असते असं शास्त्रात सांगितलं जातं. आजच्या आधुनिक काळात आपल्या सर्वांच्याच घरी फ्रिज (Refrigerator) आहे. आपण बाजारहाट करून आलो की सर्व भाज्या एकाच वेळी फ्रिजमध्ये भरून ठेवतो. अनेकदा मिरचीच्याच डब्यात किंवा टोपलीत आपण लिंबूही ठेवतो.
पण तुम्हाला माहीत आहे का? ही एक छोटीशी सवय तुमच्या घरात कटकटी आणि अशांतीचं कारण ठरू शकते. प्रसिद्ध कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांनी नुकत्याच एका प्रवचनात याविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. लिंबू आणि मिरची एकत्र का ठेवू नयेत? यामागे नेमकी काय श्रद्धा आणि तर्क आहे? जाणून घेऊया.
लिंबू-मिरची एकत्र ठेवल्याने 'क्लेश' वाढतात?
देवकीनंदन ठाकूर यांच्या मते, लिंबू आणि मिरची या दोन्ही वस्तूंची प्रकृती अत्यंत 'तीव्र' असते. धार्मिक आणि पारंपारिक मान्यतेनुसार या दोन्ही गोष्टींचा संबंध ऊर्जेशी जोडला जातो. मिरची खाल्ल्यावर लगेच तिखटपणा जाणवतो, तर लिंबू प्यायल्यावर त्याचा आंबटपणा जिभेला झणझणून सोडतो.
advertisement
जेव्हा आपण या दोन तीव्र प्रकृतीच्या गोष्टी एकाच डब्यात किंवा फ्रिजमध्ये एकाच जागेवर ठेवतो, तेव्हा त्यातून निर्माण होणारी ऊर्जा घरातील वातावरणावर नकारात्मक प्रभाव टाकू शकते. यामुळे घरात विनाकारण वादविवाद, तणाव आणि क्लेश निर्माण होण्याची शक्यता असते, असं त्यांनी सांगितलं.
आधुनिक जीवनशैली आणि जुन्या परंपरा
आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण सोयीला महत्त्व देतो, पण परंपरेला विसरत चाललो आहोत. देवकीनंदन ठाकूर यांनी फ्रिजच्या अतिवापराबाबतही भाष्य केलं आहे.
advertisement
लिंबू आणि मिरची वेगळी ठेवण्याचा सल्ला हा केवळ एक नियम नसून, तो जीवनात शिस्त आणि संतुलन राखण्याचा एक संदेश आहे, असंही ते म्हणाले.
advertisement
advertisement
View this post on Instagram
advertisement
advertisement
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
लिंबू मिरची फ्रिजमध्ये एकत्र ठेवता? मग तुम्ही मोठी चुक करताय; देवकीनंदन ठाकूर यांनी सांगितलं कारण, पाहा VIDEO
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement