advertisement

ऐषोआरामी जीवनाचा केला त्याग, 26 वर्षांच्या 2 तरुणी झाल्या संन्यासी; आई-वडिलांना झाला आनंद!

Last Updated:

मानस‍ी (MA Psychology) आणि गोकाकच्या भक्ती (BA LLB) या दोन तरुणींनी फक्त २६ व्या वर्षी ऐहिक सुखांचा त्याग करून जैन संन्यास स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. "भौतिक आयुष्यात काहीच नाही...

Jain sanyasa
Jain sanyasa
मानवी जीवनात जन्म घेतल्यावर प्रत्येकाला ऐहिक सुखांचा उपभोग घ्यावा वाटतो. पण दावणगेरेच्या एमए सायकॉलॉजी शिकलेल्या मानसी आणि गोकाकच्या बीए एलएलबी केलेल्या जैन समाजातील भक्ती या दोन तरुणींनी संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. अवघ्या 26 वर्षांच्या असलेल्या या तरुणींना ऐहिक जीवनाचा अनुभव घेतल्यानंतर यात काहीच नाही, तर संन्यासातच खरं सुख आहे, हे उमगलं आहे. त्यामुळेच या दोघींनी संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आणि दावणगेरेतील रेणुका मंदिरात त्यांची मूर्तिपूजा करण्यात आली.
मूर्तिपूजा म्हणजे काय?
मूर्तिपूजा म्हणजे, संन्यास स्वीकारणाऱ्या व्यक्तींची एक भव्य मिरवणूक काढली जाते. त्यांना मूर्तीसमान मानलं जातं आणि त्यांची पूजा केली जाते. या सोहळ्यात नागरिक, त्यांचे शेजारी आणि अगदी अपरिचित लोकही येतात. सर्व नातेवाईक या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांना अखेरचा निरोप देतात.
संन्यासातच जीवनाचं खरं सुख
जीवनातील सर्व बंधनातून मुक्ती मिळते म्हणून संन्यासातच जीवनाचं खरं सुख आहे, असं या दोघी तरुणींनी यावेळी सांगितलं. सामाजिक सेवा आणि धार्मिक सेवेतून त्यांना परम सत्य आणि आनंद मिळेल, म्हणूनच त्या संन्यास घेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
advertisement
ऐषोआरामी जीवनाचा अंत
या तरुणींना 17 नोव्हेंबर रोजी झारखंडमध्ये परम पूज्य आचार्य श्री मुक्तिप्रभु सुरेश्वरजी महाराज यांच्या निवासस्थानी आणि परम पूज्य साध्वी श्री पूर्णप्रज्ञाश्रीजी महाराज साहेब यांच्या उपस्थितीत रुजुबालिका तीर्थक्षेत्रात जैन संन्यासाची दीक्षा मिळणार आहे. जैन संन्यास घेतल्यानंतर त्या आपली रोजची कपडे सोडून पांढरी वस्त्रं परिधान करतील आणि धर्मप्रचार करतील. एकदा संन्यासाची दीक्षा घेतली की त्यांच्या ऐषोआरामी जीवनाचा तिथेच अंत होतो. पाऊस, थंडी किंवा ऊन याची पर्वा न करता त्या फिरतील आणि धर्मप्रसार करतील. त्या समाजाला धर्म शिकवतील आणि तिथेच त्या परम सत्याचा शोध घेतील.
advertisement
आई-वडिलांनाही झाला आनंद
आई-वडिलांना आपल्या मुला-मुलींची लग्न होऊन नातवंडं पाहायला आवडतात. पण या तरुणींनी संन्यासी होण्याचा निर्णय घेतला आहे. मुलांच्या या निर्णयाला आई-वडिलांनी विरोध केलेला नाही किंवा त्यांना याचं दुःखही झालेलं नाही. दीक्षा घेण्यासाठी जेव्हा त्या जातील, तेव्हा त्यांनी आनंदाने स्वीकारलं पाहिजे. आणि आई-वडील आणि कुटुंबानेही त्यांना आनंदाने निरोप दिला पाहिजे. तेव्हाच संन्यासाला अर्थ आहे, असं त्यांना वाटतं. मात्र, जीवनाचा अनुभव घेण्याच्या टप्प्यावर घेतलेल्या या निर्णयाने सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं आहे. राजघराण्यात जन्माला येऊन सर्वस्वाचा त्याग करणारे भगवान महावीर यांनी संन्यास घेऊन धर्मप्रचार केला, त्याच मार्गावर या दोन तरुणीही निघाल्या आहेत, हे खरंच आश्चर्यकारक आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
ऐषोआरामी जीवनाचा केला त्याग, 26 वर्षांच्या 2 तरुणी झाल्या संन्यासी; आई-वडिलांना झाला आनंद!
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement