Surya Grahan 2023: ग्रहण लागताच पशु-पक्षांसोबत घडतात अशा गोष्टी, हालचालीत असा जाणवतो बदल
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Surya Grahan 2023: ग्रहणाचा परिणाम केवळ मानवांवरच होत नाही तर त्याचा परिणाम पशु-पक्ष्यांवरही दिसून येतो. ग्रहण काळात अनेक प्राणी आणि पक्ष्यांचे वागणे विचित्र असते. ग्रहणाचा कालावधी संपताच ते सर्व सामान्य स्थितीत परत येतात.
मुंबई, 11 ऑक्टोबर : हिंदू धर्मीय प्रथा-परंपरानुसार ग्रहण अशुभ मानलं जातं. मग ते सूर्यग्रहण असो वा चंद्रग्रहण. हे दोन्ही ग्रहण अशुभ मानून ग्रहण काळात कोणतेही महत्त्वाचे काम करणे वर्ज्य मानले जाते. ग्रहणाचा परिणाम केवळ मानवांवरच होत नाही तर त्याचा परिणाम पशु-पक्ष्यांवरही दिसून येतो. ग्रहण काळात अनेक प्राणी आणि पक्ष्यांचे वागणे विचित्र असते. ग्रहणाचा कालावधी संपताच ते सर्व सामान्य स्थितीत परत येतात. पंडित हितेंद्रकुमार शर्मा यांनी या घटनेमागचे कारण सांगितले आहे. याविषयी पंडितजी काय म्हणतात ते जाणून घेऊया.
पंडितजींनी सांगितले की ग्रहण नेहमी पौर्णिमा किंवा अमावास्येला होते. या दरम्यान, चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती खूप प्रभावी असते. जी केवळ प्राण्यांवरच नाही तर समुद्राला देखील प्रभावित करते. चंद्रावर पाण्याचे वर्चस्व आहे, ज्यामुळे पाणी सापडलेल्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम होतो. यामुळेच ग्रहण काळात प्राणी विचित्र वर्तन करू लागतात.
एका अहवालानुसार, ग्रहण काळात कोळ्यांच्या (कोष्टी) काही प्रजातींमध्ये काही विचित्र वर्तन पाहायला मिळते. ग्रहण काळात, कोळी अस्वस्थ होतात आणि आपले जाळे तोडतात आणि ग्रहण संपल्याबरोबर ते पुन्हा विणणे सुरू करतात.
advertisement
त्याच वेळी ग्रहणाच्या वेळी रात्र असल्याच्या भ्रमात वटवाघुळं इकडे तिकडे अस्वस्थपणे उडू लागतात. याशिवाय अर्जेंटिना आणि ब्राझीलमध्ये आढळणाऱ्या माकडांची एक प्रजाती, ज्याला नाईट मंकी म्हणून ओळखले जाते, ते सहसा खूप उड्या मारतात पण ग्रहण सुरू असताना ते घाबरतात आणि झाडांवर थोडं चालायलाही घाबरतात.
advertisement
पाण्यात राहणारा पाणघोडादेखील सूर्यग्रहण सुरू होताच घाबरतो. तो दुष्काळ पडल्यासारखा पाण्यापासून दूर पळू लागतो. निम्म्या रस्त्यातच जर ग्रहण संपलं तर तो परत पाण्याकडे जाऊ लागतो.
शास्त्रज्ञांनी जंगली बर्फाच्छादित बदक गीजचे संशोधन केलं. शास्त्रज्ञांनी त्या बदकाच्या शरीरात एक छोटी चीप लावली होती, ज्यावरून असे दिसून आले की ग्रहणकाळात या बदकांच्या हृदयाचे ठोके वाढतात आणि ग्रहण संपताच ते सामान्य स्थितीत येतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ग्रहणांविषयी सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 11, 2023 10:00 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Surya Grahan 2023: ग्रहण लागताच पशु-पक्षांसोबत घडतात अशा गोष्टी, हालचालीत असा जाणवतो बदल


