घरात 'या' ठिकाणी कापराचा तुकडा ठेवणं फायद्याचं, येणार नाही पैशांची अडचण
- Published by:Kranti Kanetkar
- trending desk
Last Updated:
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये नियमित कापूर जाळल्यास आर्थिक समस्या दूर होऊ शकतात. घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
मुंबई : कापराचा वापर पूजेवेळी मोठ्या प्रमाणात केला जातो. आरती करताना कापूर लावून आरती केली जाते. असं करणं खूप शुभ मानलं जातं. पूजा पूर्ण करण्यासाठी कापूर लावला जातो. वास्तुशास्त्रानुसार कापूर घरातील वातावरण शुद्ध करतो. कापूर घरामध्ये पसरलेली नकारात्मकता दूर करून सकारात्मक ऊर्जा पसरवतो. कापूर घरातील वास्तुदोषही दूर करतो आणि सुख, शांती, समृद्धी आणि संपत्ती वाढवू शकतो. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये नियमित कापूर जाळल्यास आर्थिक समस्या दूर होऊ शकतात. घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
पूजेच्या खोलीत कापूर ठेवणं शुभ मानलं जातं. त्यामुळे ऊर्जा वाढते, घरातील वातावरण स्वच्छ आणि शुद्ध होतं आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. यामुळे कुटुंबातील सदस्यांना मानसिक शांती मिळते. वास्तुनुसार, कापूर घरातील पूजेच्या खोलीत ठेवणं सर्वांत आवश्यक मानलं जातं. कापूर सकारात्मक ऊर्जा पसरवतो आणि घरातील वातावरण शुद्ध करतो. बेडरूममध्ये कापराचा तुकडा ठेवल्यास घरातील लोकांना मानसिक शांती मिळते.
advertisement
तसेच यामुळे चांगली झोपही लागते. घरात प्रवेशद्वाराजवळ कापराचा तुकडा ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्ती दूर राहतात. यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होतं. वास्तुनुसार, स्वयंपाकघरात कापूर ठेवल्याने खाद्यपदार्थांना किडे किंवा कीटक लागत नाहीत. तसंच यामुळे कधीच अन्न व संपत्ती कमी होत नाही.
रोज सकाळी आंघोळ करून पूजा करत असाल तर कापूर अवश्य लावावा. कापरामुळे घरातील वातावरण शुद्ध करण्यासोबतच अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. इतकंच नाही तर कापूर जाळल्यास घरात समृद्धी येते आणि भरभराट येते.
advertisement
जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्या असतील तर कापराचे उपाय करून पहा. घराच्या तिजोरीत कापराचा तुकडा ठेवा. यामुळे पैशाची आवक होण्याची शक्यता आहे. तसेच अनावश्यक खर्च होणार नाही. तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा खिशातही कापूर ठेवू शकता. याचाही फायदा होईल आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात होईल.
हिंदू धर्मात कापूर हा पूजा साहित्यातील अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. आरतीनंतर रोज कापूर जाळल्याने घरातील वातावरण शुद्ध होतं. सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. या शिवाय वास्तू आणि ज्योतिषशास्त्रात कापराला खूप महत्त्व देण्यात आले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 01, 2024 4:17 PM IST


