Garuda Purana: अनेकांना माहीत नाही, पण परस्त्रीशी शरीरसंबंध ठेवणाऱ्यांना अशी मिळते शिक्षा - गरुड पुराण
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Garuda Purana: गरुड पुराणात विशेषतः स्वतःच्या पत्नीला फसवणाऱ्या किंवा परस्त्रीशी संबंध ठेवणाऱ्या पुरुषांना मिळणाऱ्या शिक्षांचा उल्लेख केला आहे, ज्या ऐकूनच कोणाचाही थरकाप उडेल. यामुळेच गरुड पुराण सांगते की, कधीही परस्त्रीशी अनैतिक संबंध ठेवू नयेत.
मुंबई : हिंदू धर्मशास्त्रात विवाह ही महत्त्वाची बाब आहे. समाज व्यवस्थेचा तो पाया आहे, विवाह म्हणजे फक्त एक सामाजिक करार नसून ते एक पवित्र आध्यात्मिक बंधन मानले जाते. गरुड पुराणात याविषयी सविस्तर माहिती दिली असून जे लोक आपल्या जोडीदाराशी विश्वासघात करतात किंवा अधर्माचा मार्ग निवडतात, त्यांचे भविष्य फारच भयानक असू शकते. गरुड पुराणात विशेषतः स्वतःच्या पत्नीला फसवणाऱ्या किंवा परस्त्रीशी संबंध ठेवणाऱ्या पुरुषांना मिळणाऱ्या शिक्षांचा उल्लेख केला आहे, ज्या ऐकूनच कोणाचाही थरकाप उडेल. यामुळेच गरुड पुराण सांगते की, कधीही परस्त्रीशी अनैतिक संबंध ठेवू नयेत. यमराज अशा पाप कर्मांसाठी कोणत्या भयानक शिक्षा देतात, त्याबद्दल आज जाणून घेऊ.
गरुड पुराणानुसार, जो पुरुष आपल्या पतिव्रता पत्नीला सोडून दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध ठेवतो, त्याला मृत्यूनंतर यमलोकात अत्यंत कठोर यातना दिल्या जातात. या पापांच्या श्रेणीनुसार आत्म्याला वेगवेगळ्या नरकात पाठवले जाते. तप्तसूर्मि नावाच्या नरकात अशा पापी लोकांना ठेवले जाते, ज्यांनी वासनेपोटी सर्व मर्यादा ओलांडलेल्या असतात. येथे व्यक्तीच्या आत्म्याला तापलेल्या लाल लोखंडाच्या अगणित सुयांनी टोचले जाते, ही पीडा सहन करण्याच्या पलीकडे असते.
advertisement
विश्वासघात करणाऱ्या आत्म्यांना अंधतमिस्त्र नावाच्या काळोख्या नरकात ढकलले जाते. येथे व्यक्तीला कित्येक मैलांपर्यंत अणकुचीदार काटे आणि विषारी प्राण्यांनी भरलेल्या वाटेवरून अनवाणी चालायला लावले जाते. दाट अंधारामुळे रस्ता दिसत नाही, ज्यामुळे तो वारंवार पडतो आणि जखमी होतो. तसेच व्रजदंश नरकात लोखंडासारखे मजबूत आणि अणकुचीदार दात असलेले भयानक प्राणी पापी व्यक्तीच्या शरीराचे लचके तोडतात आणि त्याला चावतात. जोपर्यंत कर्मांचा हिशोब पूर्ण होत नाही, तोपर्यंत ही शिक्षा सुरूच राहते.
advertisement
गरुड पुराणात केवळ विश्वासघातच नाही, तर पत्नीवर केलेला मानसिक आणि शारीरिक अत्याचार सुद्धा महापाप मानला गेला आहे. जो माणूस आपल्या पत्नीचा छळ करतो किंवा तिच्यावर हात उचलतो, त्याला रौरव नरकाच्या आगीत फेकून दिले जाते. शास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीने आपल्या पत्नीला आयुष्यभर जितके कष्ट दिले असतील, यमदूत त्यापेक्षा हजार पटीने जास्त कष्ट त्या व्यक्तीला देतात. ही शिक्षा काही दिवसांची नसून हजारो वर्षांपर्यंत चालते. जोपर्यंत आत्मा आपल्या पापांचे फळ भोगत नाही, तोपर्यंत त्याला पुढचा जन्म किंवा मुक्ती मिळत नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 14, 2026 12:10 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Garuda Purana: अनेकांना माहीत नाही, पण परस्त्रीशी शरीरसंबंध ठेवणाऱ्यांना अशी मिळते शिक्षा - गरुड पुराण









