advertisement

Garud Puran: मृत्यूनंतर घरात गरुड पुराण वाचणं का गरजेचं; 13 दिवस आत्मा घुटमळतो? इतके सांगितलेत फायदे

Last Updated:

Garud Puran: गरुड पुराणात मृत्यू नंतरच्या प्रवासाचे सविस्तर वर्णन आहे, जे ऐकल्यामुळे मृत आत्म्याला आपला या शरीराशी असलेला मोह संपला आहे हे समजण्यास मदत होते. असे मानले जाते की, मृत्यूनंतर आत्मा 13 दिवस आपल्या घराच्या आसपासच वावरत असतो..

News18
News18
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वत्र दु:खद वातावरण आहे. मृत्यूनंतर हिंदू धर्मात काही धार्मिक विधी केल्या जातात. हिंदू धर्मात मृत्यू नंतर गरुड पुराणाचे वाचन करणे ही एक अत्यंत महत्त्वाची आध्यात्मिक आणि मानसशास्त्रीय परंपरा मानली जाते. मृत्यूनंतर गरुड पुराण वाचण्यामागे अनेक महत्त्वाची कारणे आहेत. हिंदू मान्यतेनुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा त्या व्यक्तीचा आत्मा गरुड पुराण ऐकल्यानंतरच खऱ्या अर्थाने घर सोडून पुढच्या प्रवासाला निघतो. हे केवळ एक धार्मिक विधी नसून त्यामागे आत्म्याला शांती देण्याचा उद्देश असतो.
गरुड पुराणात मृत्यू नंतरच्या प्रवासाचे सविस्तर वर्णन आहे, जे ऐकल्यामुळे मृत आत्म्याला आपला या शरीराशी असलेला मोह संपला आहे हे समजण्यास मदत होते. असे मानले जाते की, मृत्यूनंतर आत्मा 13 दिवस आपल्या घराच्या आसपासच वावरत असतो आणि या काळात गरुड पुराण ऐकल्याने आत्म्याला नवीन प्रवासाची दिशा मिळते. हे पुराण केवळ मृतांसाठी नाही तर जिवंत असलेल्या कुटुंबासाठीही आहे, कारण यातून कर्माचे महत्त्व, मोहाचा त्याग आणि पाप-पुण्य याबद्दल माहिती मिळते. मृत्यूमुळे घरातील वातावरण अत्यंत दुखी आणि जड झालेले असते, अशा वेळी 13 दिवस नियमित पठण केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
advertisement
भारतीय ग्रंथांनुसार मृत्यूनंतर लगेचच आत्म्याला हे मान्य होत नाही की, त्याचे शरीर आता निर्जीव झाले आहे. जेव्हा आत्मा आपल्या प्रियजनांना रडताना पाहतो तेव्हा तो त्यांना सांत्वन देण्याचा प्रयत्न करतो पण संवाद साधू शकत नाही. या मोहाच्या बंधनामुळे तो घराच्या सीमांमध्ये अडकून राहतो. गरुड पुराणात म्हटले आहे की अंत्यसंस्कारापूर्वी आत्मा जुन्या शरीरात परतण्याचा प्रयत्न करतो आणि अंत्यसंस्कारानंतरही तो घरात वावरू शकतो. म्हणूनच गरुड पुराणाच्या माध्यमातून त्याचा मोह संपवून त्याला पुढच्या प्रवासासाठी ऊर्जा दिली जाते. 10 व्या ते 13 व्या दिवसाच्या विधींनंतरच आत्मा पितृलोक किंवा यमलोकाच्या प्रवासासाठी सक्षम होतो.
advertisement
हे पुराण भगवान विष्णूंचे वाहन गरुडाने विष्णूंकडून प्राप्त केले आणि नंतर ऋषीमुनींना सांगितले. याचे संकलन महर्षि वेदव्यास यांनी केले आहे. गरुड पुराणाचे दोन मुख्य भाग आहेत, ज्यातील एक भाग जगण्याची कला, आयुर्वेद आणि सदाचारावर आधारित आहे, तर दुसरा भाग मृत्यू नंतरची स्थिती, यमलोक, पिंडदान आणि मोक्षाबद्दल माहिती देतो. यात एकूण साधारण 19000 श्लोक आहेत.
advertisement
भारतात हिंदू धर्माच्या सर्वच शाखा हे पुराण मानतात असे नाही. उदाहरणार्थ आर्य समाज पुराणांना मानत नाही आणि केवळ वेदांवर विश्वास ठेवतो. शैव परंपरेत मृत्यूनंतर शिव महिमेचे वाचन केले जाते. इतर धर्मांमध्येही अशाच काही मान्यता आहेत. इस्लाममध्ये दफन करेपर्यंत रूह आसपास असते, अशी मान्यता आहे, तर तिबेटी बौद्ध धर्मात आत्मा 49 दिवस मध्यवर्ती स्थितीत राहतो असे मानले जाते. पारसी धर्मात आत्मा 3 दिवस शरीराच्या जवळ राहतो आणि चौथ्या दिवशी पुढचा प्रवास सुरू करतो. प्राचीन इजिप्तमध्ये तर लोक मृतदेहासोबत अन्न आणि दागिने ठेवत असत जेणेकरून आत्म्याचा पुढचा प्रवास सुकर व्हावा. थोडक्यात सांगायचे तर जगातील बहुतांश संस्कृती हे मानतात की मृत्यू म्हणजे शेवट नसून तो केवळ एका प्रवासाचा टप्पा आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Garud Puran: मृत्यूनंतर घरात गरुड पुराण वाचणं का गरजेचं; 13 दिवस आत्मा घुटमळतो? इतके सांगितलेत फायदे
Next Article
advertisement
Gold Price : ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पांढरे
ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पा
  • लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत

  • जागतिक बाजारातील घडामोडी आणि लग्नसराईमुळे वाढलेली मागणी यामुळे सोन्याच्या दराने

  • सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

View All
advertisement