IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव, तरी टीम इंडिया WTC Final ला पोहोचणार! काय आहे सिनारियो?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा 30 रननी पराभव झाला, त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्येही टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.
कोलकाता : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा 30 रननी पराभव झाला, त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्येही टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये भारतीय टीम चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे, त्यामुळे शुभमन गिलची टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला पोहोचणार का नाही? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडिया सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. भारताने या सत्रात आतापर्यंत 8 मॅच खेळल्या आहेत, ज्यात त्यांनी 4 मॅच जिंकल्या असून 3 मॅच गमावल्या तर एक सामना ड्रॉ झाला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या या सत्रात टीम इंडियाचे आता 10 सामने शिल्लक आहेत.
टीम इंडिया फायनलला पोहोचणार का?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या प्रत्येक सामन्यात टीमला विजयांमुळे 12 पॉईंट्स, मॅच ड्रॉ झाल्यास 6 पॉईंट्स आणि पराभव झाल्यास शून्य पॉईंट मिळतात. भारताने आतापर्यंत 8 टेस्ट खेळल्या आहेत, ज्यात 4 विजयांसह भारताने 52 पॉईंट्स मिळवले आहेत, त्यामुळे त्यांची विजयी टक्केवारी 54.17 टक्के एवढी आहे. मागच्या WTC सत्रांवर नजर टाकली तर फायनलला पोहोचण्यासाठी टीमला 64 ते 68 टक्क्यांची विजयी टक्केवारी पुरेशी ठरते. फायनलच्या दोन टीमपर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय टीमला या विजयी टक्केवारीपर्यंत पोहोचावे लागेल.
advertisement
भारताचे उरलेले सामने कुणाविरुद्ध?
भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या उरलेल्या मॅच महत्त्वाच्या ठरणार आहे. गुवाहाटीमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुवाहाटीमध्ये सीरिजची शेवटची मॅच होईल. यानंतर भारतीय टीम श्रीलंकेमध्ये त्यांच्या घरच्या मैदानात 2 टेस्ट मॅचची सीपिद खेळेल, जिथल्या खेळपट्ट्या स्पिन बॉलिंगसाठी अनुकूल आहेत. यानंतर न्यूझीलंड दौऱ्यावर 2 टेस्ट मॅच होतील, आणि शेवटी घरच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 टेस्ट मॅचची सीरिज होईल. या सीरिजनंतरच भारतीय टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार का नाही? याचा निर्णय होईल.
advertisement
टीम इंडिया फायनलला कशी पोहोचणार?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला उरलेल्या 10 पैकी किमान 7 मॅच जिंकाव्या लागणार आहेत, ज्यामुळे त्यांचे पॉईंट्स 136 होतील, तसंच त्यांची विजयी टक्केवारी 62.96% होईल. तसंच एकही सामना ड्रॉ झाला तर त्यांच्या खात्यात 140 पॉईंट्स (64.81%) होतील, जे फायनलमध्ये पोहोचण्यासाठी पुरेसे ठरू शकतात. दरम्यान 8 विजय मिळवले तर भारताचं फायनलमधील स्थान निश्चित होईल, कारण त्यांच्या खात्यात 148 पॉईंट्स आणि विजयी टक्केवारी 68.52 एवढी असेल.
advertisement
भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा सामना जिंकला आणि नंतर श्रीलंकेचा 2-0 ने पराभव केला तसंच न्यूझीलंडसोबत 1-1 ने बरोबरी केली, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला किमान 3 विजय मिळवावे लागतील, तर त्यांचे 7-8 विजय होतील, पण यापेक्षा जास्त पराभव किंवा ड्रॉमध्ये टीम इंडियासमोरचा धोका वाढू शकतो.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 17, 2025 6:50 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव, तरी टीम इंडिया WTC Final ला पोहोचणार! काय आहे सिनारियो?


