Rishabh Pant : साऊथ अफ्रिकेने मोडला टीम इंडियाचा घमंड! ऋषभने कुणावर फोडलं पराभवाचं खापर? म्हणाला 'आमचा प्लॅन तर...'

Last Updated:

Rishabh Pant Statement After Guwahati Test : साऊथ अफ्रिकन बॉलर्सने चांगली बॉलिंग केली, त्यामुळे आम्हाला सामन्यातून पराभव स्विकारावा लागला, असंही ऋषभ पंत म्हणाला आहे.

Rishabh Pant Statement After Guwahati Test
Rishabh Pant Statement After Guwahati Test
IND vs SA 2nd Test Result : गुवाहाटीच्या मैदानावर साऊथ अफ्रिकेने टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव केला आहे. पाहुण्या संघाने टीम इंडियाला तब्बल 408 धावांनी हरवलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी क्रिकेट मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाचा कॅप्टन ऋषभ पंत निराशा व्यक्त करताना दिसला. मालिका गमावल्यामुळे दुःखी असलेला ऋषभ पंत म्हणाला की, एक टीम म्हणून आम्हाला अधिक चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे आणि विरोधी संघाला त्यांच्या उत्कृष्ट खेळाबद्दल श्रेय दिले पाहिजे.

भविष्यात सुधारणा करण्यासाठी...

पराभवानंतर बोलताना पंत म्हणाला की, "हा निकाल थोडा निराशाजनक आहे." त्याने सांगितले की, आम्ही यातून लर्निंग घेऊन एकजूट राहायला हवे. विरोधी संघाने मालिकेत वर्चस्व गाजवले, पण तरीही तुम्ही त्यांच्या कामगिरीला गृहीत धरू शकत नाही. भविष्यात सुधारणा करण्यासाठी ऋषभने माइंडसेट स्पष्ट ठेवण्यावर जोर दिला. तसेच साऊथ अफ्रिकन बॉलर्सने चांगली बॉलिंग केली, त्यामुळे आम्हाला सामन्यातून पराभव स्विकारावा लागला, असंही ऋषभ पंत म्हणाला आहे.

आम्ही ते करू शकलो नाही... - ऋषभ

advertisement
ऋषभ पंतने मान्य केलं की, 'त्यांनी आमच्यापेक्षा निश्चितच चांगलं क्रिकेट खेळले. क्रिकेटची मागणी असते की, तुम्हाला एक टीम म्हणून मिळालेल्या संधींचा पुरेपूर फायदा उठवावा लागतो.' तो म्हणाला की, आम्ही ते करू शकलो नाही आणि त्यामुळे आम्हाला संपूर्ण मालिका गमवावी लागली. या मालिकेतून आम्ही आमच्या प्लान वर लक्ष केंद्रित करणं ही सकारात्मक गोष्ट घेऊ, असंही पंतने शेवटी स्पष्ट केलं आहे.
advertisement

सात सामन्यांतील भारताचा पाचवा पराभव

दरम्यान, एकेकाळी भारताला घरच्या मैदानावर हरवणे कठीण वाटायचे. पण आता असे दिसते की भारताचा अजिंक्य किल्ला मोडला गेला आहे. न्यूझीलंडनंतर दक्षिण आफ्रिकेनेही त्यांना क्लीन क्लीन केले आहे. गेल्या 66 वर्षांत घरच्या मैदानावर सात सामन्यांतील भारताचा हा पाचवा पराभव आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये मालिका 0-2 ने गमावल्यानंतर भारताला पॉइंट टेबलमध्ये मोठा धक्का बसला. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि पाकिस्ताननंतर भारत पाचव्या स्थानावर घसरला आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rishabh Pant : साऊथ अफ्रिकेने मोडला टीम इंडियाचा घमंड! ऋषभने कुणावर फोडलं पराभवाचं खापर? म्हणाला 'आमचा प्लॅन तर...'
Next Article
advertisement
BMC Election : जे ठाकरेंना समजलं, ते काँग्रेसला कळणार का? बीएमसी निवडणुकीआधी धक्कादायक आकडे समोर...
जे ठाकरेंना समजलं, ते काँग्रेसला कळणार का? BMC निवडणुकीआधी धक्कादायक आकडे समो
  • जे ठाकरेंना समजलं, ते काँग्रेसला कळणार का? बीएमसी निवडणुकीआधी धक्कादायक आकडे समो

  • जे ठाकरेंना समजलं, ते काँग्रेसला कळणार का? बीएमसी निवडणुकीआधी धक्कादायक आकडे समो

  • जे ठाकरेंना समजलं, ते काँग्रेसला कळणार का? बीएमसी निवडणुकीआधी धक्कादायक आकडे समो

View All
advertisement