'और कितना गिरोगे…' शिखर धवनने काढली Shahid Afridi ची लायकी, करून दिली कारगिल वॉरची आठवण!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध अधिक कटु झाले आहेत. मोठी गोष्ट म्हणजे पाकिस्तानचे मोठे खेळाडू अशी विधाने करत आहेत ज्यामुळे हा मुद्दा अधिक गंभीर होत चालला आहे.
Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर देशभरातील लोकांमध्ये संताप आहे आणि भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. या घटनेवर क्रीडा जगतातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी पहलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना वारंवार भारतावर गंभीर आरोप करत आहे. आधी त्याने भारताकडे पाकिस्तानच्या सहभागाचे पुरावे मागितले. यानंतर त्यांनी म्हटले की भारत स्वतःच आपल्या लोकांना मारतो आणि नंतर पाकिस्तानला दोष देतो.
शाहिद आफ्रिदीवर निशाणा
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध अधिक कटु झाले आहेत. मोठी गोष्ट म्हणजे पाकिस्तानचे मोठे खेळाडू अशी विधाने करत आहेत ज्यामुळे हा मुद्दा अधिक गंभीर होत चालला आहे. अलिकडेच शाहिद आफ्रिदीने भारतीय सैन्यावर एक अपमानजनक टिप्पणी केली होती ज्यावर शिखर धवनने आता प्रत्युत्तर दिले आहे. शिखर धवनने शाहिद आफ्रिदीला सांगितले की, तुम्ही आधीच इतक्या खालच्या थराला गेला आहात आणखी किती खालच्या थराला जाणार. धवनने आफ्रिदी आणि पाकिस्तानला देशाच्या आणि स्वतःच्या प्रगतीमध्ये लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.
advertisement
शिखर धवनने दिलं चोख प्रतिउत्तर
शिखर धवनने ट्विट करून शाहिद आफ्रिदीला उत्तर दिले की, 'आम्ही तुला कारगिलमध्येही हरवले होते, तू आधीच इतक्या खालच्या थराला गेला आहेस आणखी किती खालच्या थराला जाणार.' शाहिद आफ्रिदी, अनावश्यक टिप्पण्या देण्याऐवजी, तुमच्या देशाच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करणे चांगले. आम्हाला आमच्या भारतीय सैन्याचा खूप अभिमान आहे. भारत माता की जय. जय हिंद.
advertisement
Kargil mein bhi haraya tha, already itna gire hue ho aur kitna giroge, bewajah comments pass karne se acha hai apne desh ki taraqqi mai dimag lagao @SAfridiOfficial. Humein hamari Indian Army par bohot garv hai. Bharat Mata Ki Jai! Jai Hind!https://t.co/5PVA34CNSe
— Shikhar Dhawan (@SDhawan25) April 28, 2025
advertisement
आफ्रिदी काय म्हणाला?
पाकिस्तानी माध्यमांशी बोलताना शाहिद आफ्रिदी म्हणाला होता की, जर भारतात फटाके फुटले तर त्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरले जाते. आफ्रिदी म्हणाला, 'काश्मीरमध्ये तुमचे 8 लाखांचे सैन्य आहे आणि हे घडले.' याचा अर्थ असा की तुम्ही नालायक, निरुपयोगी आहात आणि तुम्ही लोकांना सुरक्षा देऊ शकत नाही. हल्ल्याच्या एका तासानंतर भारतीय मीडिया बॉलिवूड झाला हे आश्चर्यकारक आहे. कृपया, सगळं बॉलिवूड बनवू नका. केवळ शाहिद आफ्रिदीच नाही तर अनेक माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताविरुद्ध विचित्र विधाने करत आहेत. त्यानंतर माजी भारतीय क्रिकेटपटूंनीही आघाडी घेत हल्लबोल केला आहे. माजी कर्णधार सौरव गांगुली आणि मोहम्मद अझरुद्दीन यांनी म्हटले आहे की पाकिस्तान आयसीसी स्पर्धेत कोणताही सामना खेळणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 29, 2025 12:22 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'और कितना गिरोगे…' शिखर धवनने काढली Shahid Afridi ची लायकी, करून दिली कारगिल वॉरची आठवण!