T20WC : फायनल अहमदाबादला तर सेमी फायनल मुंबईत, टी20 वर्ल्ड कपबाबत मोठी अपडेट, IND vs PAK सामना कुठे?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पुढच्या वर्षी म्हणजेच 2026 ला टी20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद भारत आणि श्रीलंका या दोन देशांकडे असणार आहे. दरम्यान या स्पर्धेबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे.
T20 World Cup 2026 Schedule : पुढच्या वर्षी म्हणजेच 2026 ला टी20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद भारत आणि श्रीलंका या दोन देशांकडे असणार आहे. दरम्यान या स्पर्धेबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. त्यानुसार फायनल सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये तर ओपनिंग सामना हा मुंबईच्या वानखडे स्टेडिअमवर खेळवला जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून समोर येत आहे. पण भारत आणि पाकिस्तान सामना कुणे रंगणार? हे जाणून घेऊयात.
advertisement
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार,टी20 वर्ल्ड कपचा पहिला ओपनिंग सामना हा मुंबईच्या वानखडे स्टेडिअमवर रंगणार आहे. तर फायनल सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममधअये खेळवला जाणार आहे.तसेच ओपनिंगसह सेमी फायनल सामना ही मुंबईत खेळवला जाईल. आणि जर भारत आणि पाकिस्तान सेमी फायनलला आमने सामने आले तर सामना कोलंबोमध्ये खेळवला जाणार आहे, अशी माहिती आहे.
advertisement
सात ठिकाणी सामने पार पडणार
भारत श्रीलंका सह-यजमान असल्याने ही स्पर्धा दोन्ही देशांमधील सात ठिकाणी खेळवली जाईल. मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता आणि अहमदाबाद या राज्यात सामन्यांचे आयोजन होण्याची शक्यता आहे, तर श्रीलंकेत तीन ठिकाणे असतील. प्रेमदासा स्टेडियम व्यतिरिक्त पल्लेकेले आणि दाम्बुला आणि हंबनटोटा यापैकी एक मैदान हे यजमानपद भूषवणार असल्याचे समजते.
advertisement
दरम्यान भारतीय संघ मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या चारही प्रमुख शहरांमध्ये खेळण्याची अपेक्षा आहे. या संदर्भात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) येत्या काही दिवसांत वेळापत्रक जाहीर करण्याची अपेक्षा असल्याने नरेंद्र मोदी स्टेडियमला अंतिम सामन्याचे आयोजन करण्यासाठी निवडण्यात आले आहे.
दरम्यान, आयसीसीने बीसीसीआयला स्पष्ट केले आहे की जर श्रीलंका उपांत्य फेरीत पोहोचला तर शेजारील देश कोलंबोमध्ये खेळेल. आणि जर पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचला तर स्पर्धेतील अंतिम सामना तटस्थ ठिकाणी खेळवला जाईल.
advertisement
भारतीय बोर्डाने स्पष्ट केले आहे की भारत पाकिस्तानशी सामना करणार आहे, तर तो सामना पूर्वी झालेल्या करारानुसार श्रीलंकेत खेळवला जाईल. भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्यानंतर आणि दोन्ही बोर्डांनी आयसीसी आणि कॉन्टिनेंटल स्पर्धांमध्ये तटस्थ ठिकाणी त्यांचे सामने खेळवण्याचा करार केल्यानंतर, बीसीसीआयने वेळापत्रक आयसीसीला सादर केले आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 09, 2025 8:56 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20WC : फायनल अहमदाबादला तर सेमी फायनल मुंबईत, टी20 वर्ल्ड कपबाबत मोठी अपडेट, IND vs PAK सामना कुठे?


