Thane News: होळीला पाण्याची पिशवी फेकून मारली, जाब विचारताच डोकं फिरलं, ठाण्यात भयंकर घडलं
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Thane News: होळीच्या दिवशी पाण्याने भरलेली पिशवी फेकून मारल्याचा जाब विचारल्यावरून दोन तरुणांत वाद झाला.
ठाणे: होळीचा सण संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा झाला. परंतु, रंग टाकण्यावरून काही ठिकाणी वादाचे प्रसंग घडल्याचेही वृत्त आहे. असाच एक धक्कादायक प्रकार ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात घडला आहे. होळीच्या दिवशी पाण्याने भरलेली पिशवी फेकून मारल्याचा जाब विचारल्यावर एकावर चाकू हल्ला झाला. नरेश कनोजीया असे 21 वर्षीय हल्लेखोराचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
ठाण्याच्या कोलशेत जवळ आझादनगर परिसरात 19 वर्षीय मिथीलेश राऊत हा वास्तव्यास आहे. होळीच्या दिवशी मिथीलेश हा परिसरात उभा होता. तेव्हा नरेशने त्याला पाण्याने भरेलेली पिशवी फेकून मारली. मिथीलेशने याबाबत पाण्याने भरलेली पिशवी मारू नको, अशी विनंती केली. यावरूनच दोघांमध्ये वाद वाढत गेला.
advertisement
होळीच्या दिवशी अंगावर पाण्याची पिशवी टाकण्यावरून वाद सुरू झाला. परंतु, नरेशने थेट जवळ असणारा चाकू काढला आणि मिथीलेशवर हल्ला केला. तेव्हा मिथीलेशचा मित्र बचावासाठी आला आणि त्याने तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर याप्रकरणात कापूरबावडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सुरू आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Mar 04, 2026 6:24 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Thane News: होळीला पाण्याची पिशवी फेकून मारली, जाब विचारताच डोकं फिरलं, ठाण्यात भयंकर घडलं









