advertisement

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्त्वाचं! 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार, कधी आणि कुठं?

Last Updated:

Thane Water Cut: ऐन उन्हाळ्यात पुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ऐन उन्हाळ्यात जलसंकट, ठाण्यात पाणीपुरवठा बंद राहणार, कधी आणि का? पाहा सविस्तर
ऐन उन्हाळ्यात जलसंकट, ठाण्यात पाणीपुरवठा बंद राहणार, कधी आणि का? पाहा सविस्तर
ठाणे : ऐन उन्हाळ्यात ठाणेकरांना पाणीटंचाईचा फटका बसणार आहे. शहरात सध्या मोठ्या प्रमाणात रस्ते आणि इतर विकासकामे सुरू आहेत. ठाण्यातील आनंद नगर ते साकेतदरम्यान सुरू असलेल्या एलिव्हेटेड रोडच्या कामामुळे जलवाहिनीवर परिणाम होत आहे. येत्या शुक्रवारी (27 मार्च रोजी) या कामासाठी काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कामादरम्यान इंदिरानगरकडे पाणीपुरवठा करणारी 813 मि.मी. व्यासाची जलवाहिनी बाधित होत असल्याने तिच्या जागी 900 मि.मी. व्यासाची नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. एकूण 2200 मीटर लांबीच्या या जलवाहिनीपैकी 520 मीटरपर्यंतचे काम पूर्ण झाले असून आता जुन्या जलवाहिनीला बंद करून नव्या जलवाहिनीशी जोडणी करण्यात येणार आहे.
advertisement
या कारणामुळे शुक्रवार, 27 मार्च 2026 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून शनिवार, 28 मार्च 2026 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
या भागात पुरवठा बंद राहणार
या कालावधीत इंदिरानगर, साठेनगर, आंबेवाडी, डवले नगर, सावरकरनगर, लोकमान्य नगर पाडा क्रमांक 2, 3 व 4, चैत्तीनगर, परेरानगर, झांजेनगर, श्रीनगर, किसन नगर, शिवटेकडी, शांतीनगर, कैलासनगर, भटवाडी, वारलीपाडा, रुपादेवी पाडा, रामनगर, सी. पी. तलाव तसेच येऊर परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा मिळणार नाही.
advertisement
शनिवारी पाणीपुरवठा पूर्ववत
शनिवार, 28 मार्च रोजी सकाळी 9 वाजल्यानंतर पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यात येईल. मात्र, पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक तेवढे पाणी साठवून ठेवत काटकसरीने वापर करण्याचे आवाहन ठाणे महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्त्वाचं! 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार, कधी आणि कुठं?
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement