अमरावती : हिवाळा सुरू झाला की, वातावरणात अनेक बदल घडून येतात. त्या बदलांचा परिणाम थेट प्राणी, पक्षी आणि मानवाच्या जीवनमानावर होतो. ज्यांच्याकडे पोल्ट्री फार्म आहे त्यांना तर विशेष काळजी घ्यावी लागते. कारण थंड वातावरणामुळे कोंबड्यांच्या आरोग्यावर, अंडी उत्पादनावर आणि वाढीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हिवाळ्यात कोंबड्यांची काळजी कशी घ्यावी? याबाबत माहिती असणे गरजेचे आहे. यासंदर्भात माहिती रविंद्र मेटकर यांनी दिली आहे.



