बीड : आजच्या घडीला जमिनीची सुपीकता कमी होणे हे शेतीसमोरील सर्वात मोठ्या प्रश्नांपैकी एक मानले जात आहे. सतत रासायनिक खतांचा वापर, पाण्याची कमतरता आणि जास्त मशागत यामुळे मातीची रचना बिघडत आहे. विज्ञान सांगते की मातीला जिवंत ठेवण्यासाठी त्यात सूक्ष्मजीव असणे अत्यावश्यक आहे आणि हे सूक्ष्मजीव वाढवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नैसर्गिक पद्धत. अभ्यासानुसार नैसर्गिक उपायांद्वारे माती सुधारल्यास उत्पादनात 20-25 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. त्यामुळेच शाश्वत शेतीसाठी माती सुधारण्याचे उपाय हे आजच्या काळाची गरज ठरत आहेत. याबद्दलच कृषी अभ्यासक महादेव बिक्कड यांनी माहिती दिली आहे
Last Updated: Nov 20, 2025, 18:10 IST


