मुंबई : थंडीच्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त उष्ण पदार्थांचे सेवन केले जाते. थंडीच्या दिवसांमध्ये तीळ हे शरीरासाठी फायदेशीर ठरते. तीळ उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये त्याचे जास्त सेवन केले जाते. तसेच सणानिमित्त तिळाचे पदार्थ केले जातात. थंडीच्या दिवसात येणारा पहिलाच सण हा मकर संक्रांत असतो. संक्रांतिनिमित्त सर्वत्र तिळाच्या पदार्थांचे सेवन जास्त केले जाते. तिळाचे लाडू, तिळाची चिक्की, तिळाची भाकरी असे वेगवेगळे तिळाचे पदार्थ आपण सर्वत्रच पाहतो. पण काळानुसार पारंपारिक पद्धतीने महाराष्ट्रात भोगीला तिळाची भाकरी केली जाते. तिळाची भाकरी कशी करावी? याची रेसिपी आपल्याला सायली तोडणकर यांनी सांगितली आहे.
Last Updated: Jan 07, 2026, 16:49 IST


