पुणे: हिवाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक लोकं आपली तब्येत व्यवस्थित ठेवण्यासाठी विशेष मेहनत घेत असतात. थंडीच्या दिवसांमध्ये आपलं शरीर मोठ्या प्रमाणावर ऊर्जा खर्च करते. त्यामुळे भूकही मोठ्या प्रमाणावर लागते. ऊर्जा अधिक प्रमाणावर खर्च होत असल्यामुळे खाल्लेले अन्नही पचवते. बाहेर थंडीचा कडाका वाढत असताना शरीराचे पोषण होईल असा ब्रेकफास्ट आपण खायला हवा. खीर हा थंडीच्या दिवसांत खाण्यासाठी अतिशय उत्तम पदार्थ असून या काळात पौष्टिक खीर खायला हवी.



