मध्यपूर्वेत सुरू असलेल्या आखाती युद्धाची झळ आता थेट नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (जेएनपीए) बंदरावर उमटू लागली आहे.युद्धजन्य परिस्थितीमुळे सागरी वाहतुकीत प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. आखातातील काही सागरी मार्गांवर जहाजांवर हल्ल्याचा धोका वाढल्याने अनेक आंतरराष्ट्रीय शिपिंग कंपन्यांनी त्या मार्गांवर मालवाहतूक तात्पुरती थांबवली आहे. परिणामी, जेएनपीएतून आखाती देशांकडे जाणारी निर्यात जवळपास ठप्प झाली आहे.



