सोलापूर - मोहोळ तालुक्यातील येवली गावातील शेतकरी मनोज शेळके यांनी पोटच्या मुलासारखी जपलेली चार एकर द्राक्ष बाग अवकाळी पावसाच्या दणक्याने उद्ध्वस्त झाली. अचानक झालेल्या सरींमुळे द्राक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेळके यांचे जवळपास 25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष बेदाणे तयार करण्यासाठी शेडमध्ये ठेवण्यात आलेल्या द्राक्षांचे नुकसान झाले आहे.



