advertisement

कृषी हवामान : राज्यभर पाऊस धुमाकूळ घालणार, या जिल्ह्यांना रेड अलर्ट, पिकांना कोणत्या फवारण्या कराल?

Last Updated:

Maharashtra Weather Update : मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि पालघर परिसरात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. या सलग पावसामुळे शेतकऱ्यांनाही खरीप पिकांवर फटका बसू शकतो. सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांसाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

maharashtra rain update
maharashtra rain update
मुंबई : मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि पालघर परिसरात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. शुक्रवारपासून सुरू झालेला पाऊस सतत कोसळत असून रेल्वे व वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. हवामान विभागाने मुंबई व परिसरासाठी रेड अलर्ट दिला असून पुढील ७ दिवस गुजरात, महाराष्ट्र आणि गोव्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
या सलग पावसामुळे शेतकऱ्यांनाही खरीप पिकांवर फटका बसू शकतो. सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांसाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
सोयाबीन पिकासाठी उपाय
पाणी निचरा : सोयाबिनच्या शेतात पाणी साचल्यास मुळकुज रोग वाढतो. शेतात चर तयार करून निचरा करावा.
कीड नियंत्रण : पाने गुंडाळणारी अळी व खोडकिडा दिसल्यास इमामेक्टिन बेन्झोएट ५% SG (५ ग्रॅम/१० लिटर पाणी) फवारणी करावी.
advertisement
रोग नियंत्रण : पाने पिवळी पडणे किंवा डाग दिसल्यास कार्बेन्डाझिम + मॅन्कोजेब (२५ ग्रॅम/१० लिटर पाणी) फवारणी करावी.
खत व्यवस्थापन : अतिवृष्टीमुळे नत्र धुऊन जाते. त्यामुळे २० दिवसांच्या अंतराने युरिया २०-२५ किलो प्रति हेक्टर पेरून वरून द्यावा.
कापूस पिकासाठी उपाय
कीड नियंत्रण : गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी स्पिनोसॅड ४५% SC (३ मिली/१० लिटर पाणी) फवारणी उपयुक्त. तुडतुडे व मावा नियंत्रणासाठी थायमेथोक्साम २५% WG (३ ग्रॅम/१० लिटर पाणी) वापरावे.
advertisement
रोग नियंत्रण : पानगळ रोग टाळण्यासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड (३० ग्रॅम/१० लिटर पाणी) फवारावे.
खत व्यवस्थापन : सततच्या पावसामुळे पिकाला नत्र व सूक्ष्मअन्नद्रव्ये कमी पडतात. त्यामुळे १९:१९:१९ पाण्यात विरघळणारे खत (५ किलो/एकरी फवारणी) करावी.
तूर पिकासाठी उपाय
पाणी निचरा : तूर पिकाला पाणी साचल्यास मुळकुज रोग वाढतो. त्यामुळे शक्यतो पाणी न साचू देणे आवश्यक.
advertisement
रोग नियंत्रण : मुळकुज टाळण्यासाठी कार्बेन्डाझिम ५०% WP (२० ग्रॅम/१० लिटर पाणी) फवारणी करावी. पानांवर डाग किंवा करपा रोग दिसल्यास मॅन्कोजेब (२५ ग्रॅम/१० लिटर पाणी) वापरावे.
कीड नियंत्रण : शेंगकिडा व पानकिडा दिसल्यास लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन (१ मिली/लिटर पाणी) फवारावे.
खत व्यवस्थापन : पावसामुळे झाडांची वाढ खुंटल्यास DAP दाणेदार खत ५० किलो/हेक्टर टॉपड्रेसिंग करावे.
advertisement
प्रशासनाचे आवाहन
अतिवृष्टीमुळे अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने सांगितले आहे. शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनांवर लक्ष ठेवावे आणि कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार कीडनियंत्रण व खत व्यवस्थापन करून पिकांचे संरक्षण करावे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
कृषी हवामान : राज्यभर पाऊस धुमाकूळ घालणार, या जिल्ह्यांना रेड अलर्ट, पिकांना कोणत्या फवारण्या कराल?
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement