ई पीक पाहणीला उरले फक्त २ दिवस! मोबाईलवरुन झटपट नोंदणी कशी करायची? A TO Z माहिती
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
E Pik Pahani : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने आणि ढगफुटी सदृश्य परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. पिके वाहून जाणे, जमिनीची धूप होणे आणि शेतं तळीमय होणे यामुळे खरीप हंगाम 2025 धोक्यात आला आहे.
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने आणि ढगफुटी सदृश्य परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. पिके वाहून जाणे, जमिनीची धूप होणे आणि शेतं तळीमय होणे यामुळे खरीप हंगाम 2025 धोक्यात आला आहे. त्यात भर म्हणजे, पीक नोंदणीसाठी सुरू असलेल्या ई-पीक पाहणी प्रक्रियेत सर्व्हर सतत डाऊन होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ई-पीक पाहणीसाठीची मुदत वाढवून 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. म्हणजेच आता फक्त २ दिवस बाकी राहिले आहेत. जर तुम्ही अजूनही नोंदणी केली नसेल तर ती झटपट कशी करायची? हेच आपण जाणून घेणार आहोत..
ई-पीक पाहणी कशी करावी?
सरकारने या हंगामासाठी नवीन अॅप उपलब्ध करून दिले आहे. शेतकऱ्यांनी खालील टप्प्यांनुसार नोंदणी करावी. गुगल प्ले स्टोअरवरून E-Pik Pahani DCS 4.0.0 हे नवे अॅप डाउनलोड करा. अॅप उघडून आधार क्रमांक आणि त्याला लिंक असलेला मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा. शेताचं क्षेत्रफळ, पेरणीची तारीख, बांधावरील झाडांची संख्या व प्रकार, तसेच पडीक किंवा चालू पडीत क्षेत्राची माहिती भरा.
advertisement
यंदा सरकारने नवीन नियम लागू केला आहे. शेताच्या सीमेजवळून 50 मीटरच्या आत दोन स्पष्ट फोटो काढून अॅपवर अपलोड करणं अनिवार्य आहे. माहिती अपलोड करताना काही चूक झाली तरी काळजी करू नका.48 तासांच्या आत दुरुस्ती करता येते.
नवे फीचर्स आणि तांत्रिक सुविधा
या अॅपच्या नव्या आवृत्तीत (व्हर्जन) अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत जे की,
advertisement
जीपीएस लोकेशन ट्रॅकिंग
50 मीटर फोटो व्हेरिफिकेशन
ऑफलाइन मोड
यामुळे नेटवर्क नसतानाही शेतकरी माहिती भरून ठेवू शकतात आणि नंतर इंटरनेट मिळाल्यावर अपलोड करू शकतात.
शेतकऱ्यांसाठी विशेष सहायक
ज्यांना मोबाईल अॅप वापरण्यात अडचण येते, त्यांच्यासाठी प्रत्येक गावात सहायक नेमले जाणार आहेत. हे सहायक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करतील – अॅप कसं डाउनलोड करायचं, माहिती कशी भरायची, फोटो कसे काढायचे आणि अपलोड करायचे हे शिकवतील.
advertisement
मुदतवाढीचा फायदा
मुदतवाढ मिळाल्यामुळे आता शेतकऱ्यांना आपली खरीप पिकांची नोंद नीट आणि व्यवस्थित करण्याची संधी मिळणार आहे. योग्य नोंदणी झाल्यास पुढील काळात शेतकऱ्यांना पीकविमा, अनुदान आणि सरकारी योजना यांचा लाभ सहज मिळू शकेल.
दरम्यान, पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असतानाच ई-पीक पाहणी प्रक्रियेत आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा त्रास दुप्पट झाला होता. मात्र सरकारने दिलेल्या मुदतवाढीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आता 30 सप्टेंबरपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण करून आपली माहिती अचूकपणे भरावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 28, 2025 10:02 AM IST