advertisement

अहिल्यानगरच्या लांडगे कुटुंबीयांची मेहनत फळाला आली! या पिकातून मिळणार दीड कोटी रूपये

Last Updated:

Farmer Success Story : पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून फळबाग शेतीचा स्वीकार केल्यास मोठे आर्थिक यश मिळू शकते, याचे उत्तम उदाहरण निंबळक सारोळा बद्दी (ता. अहिल्यानगर) येथील लांडगे कुटुंबीयांनी घालून दिले आहे.

Success Story
Success Story
अहिल्यानगर : पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून फळबाग शेतीचा स्वीकार केल्यास मोठे आर्थिक यश मिळू शकते, याचे उत्तम उदाहरण निंबळक सारोळा बद्दी (ता. अहिल्यानगर) येथील लांडगे कुटुंबीयांनी घालून दिले आहे. प्रगतशील शेतकरी भीमराज लांडगे, सुभाष लांडगे आणि बाळासाहेब लांडगे यांनी सुमारे १४ एकर क्षेत्रावर संत्र्यांची लागवड करून उत्पादन वाढीसोबतच आर्थिकदृष्ट्या मोठी प्रगती साधली आहे. या बागेतून त्यांना जवळपास दीड कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.
पारंपरिक शेतीपासून फळबागेकडे वळण्याचा निर्णय
सुमारे दहा वर्षांपूर्वी लांडगे कुटुंबीयांनी शेतीत बदल करण्याचा निर्णय घेतला. पारंपरिक पिकांमधून अनिश्चित उत्पन्न, वाढणारा उत्पादन खर्च आणि पाणीटंचाई या समस्यांचा विचार करून त्यांनी फळबाग शेतीचा पर्याय निवडला. सुरुवातीला योग्य नियोजन करून संत्र्यांची लागवड करण्यात आली. सातत्यपूर्ण मेहनत, योग्य व्यवस्थापन आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन यामुळे आज ही संत्री बाग चांगली बहरली आहे.
advertisement
संत्री बागेतील झाडांची वाढ जोमदार असून सध्या मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळत आहे. बाजारपेठेत दर्जेदार संत्र्यांना चांगली मागणी असल्याने या बागेचे आर्थिक गणितही सकारात्मक ठरत आहे.
तज्ज्ञ मार्गदर्शनामुळे मिळाले यश
लांडगे कुटुंबीयांच्या संत्री बागेच्या यशामध्ये कृषी विभाग आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. कृषी सहाय्यकांनी वेळोवेळी बागेची पाहणी करून झाडांच्या वाढीबाबत आणि व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले.
advertisement
तसेच कृषी तज्ज्ञ डॉ. यशवंत गाडेकर यांनी औषध फवारणीचे वेळापत्रक, रोग आणि कीड नियंत्रणाबाबत महत्त्वाचे सल्ले दिले. दर आठवड्याला बागेची पाहणी करून केलेल्या सूचनांमुळे झाडांची वाढ चांगली झाली. योग्य वेळी केलेली फवारणी आणि काळजीपूर्वक केलेले व्यवस्थापन यामुळे फळांची गुणवत्ता टिकून राहिली.
सेंद्रिय घटकांचा प्रभावी वापर
संत्री बागेसाठी लांडगे यांनी सेंद्रिय पद्धतीवर अधिक भर दिला आहे. शेणखत, शेंगदाणा पेंडी आणि इतर सेंद्रिय घटकांचा वापर करून जमिनीची मशागत करण्यात आली. यामुळे जमिनीची सुपीकता वाढली आणि झाडांची वाढही निरोगी राहिली.
advertisement
तसेच नियंत्रित पद्धतीने आधुनिक उपाययोजना आणि योग्य फवारणी केल्यामुळे रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी झाला. सध्या प्रत्येक झाडावर सरासरी १२ कॅरेटपर्यंत संत्र्यांचे उत्पादन मिळत आहे. फळांचा आकार, रंग आणि चव उत्कृष्ट असल्यामुळे बाजारात या संत्र्यांना चांगला दर मिळत आहे.
शासन योजनांचा लाभ
लांडगे कुटुंबीयांनी शासनाच्या विविध योजनांचा योग्य प्रकारे लाभ घेतला. फलोत्पादन विभागामार्फत शेततळे, मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचन यांसारख्या योजनांचे अनुदान मिळाले.
advertisement
शेततळ्यामुळे पाण्याची उपलब्धता वाढली आणि सिंचनाचे नियोजन करणे सोपे झाले. ठिबक सिंचनामुळे पाण्याचा अपव्यय टळला तसेच झाडांना आवश्यक तेवढेच पाणी दिले गेले. यामुळे फळांची गुणवत्ता टिकून राहिली.
परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी प्रयोग
लांडगे कुटुंबीयांची संत्री बाग केवळ त्यांच्या वैयक्तिक यशाची कहाणी नाही, तर परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. योग्य नियोजन, मेहनत आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाल्यास फळबाग शेतीतून मोठे उत्पन्न मिळू शकते, हे या प्रयोगातून स्पष्ट झाले आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
अहिल्यानगरच्या लांडगे कुटुंबीयांची मेहनत फळाला आली! या पिकातून मिळणार दीड कोटी रूपये
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement