जबरदस्त! लोकांनी फेकून दिलेली 4,000 रोपं स्वत:च्या शेतात लावली, अन् साताऱ्याचा ऋषिकेश आता करतोय 3.5 कोटींची कमाई

Last Updated:

Success Story : आयुष्य कितीही कठीण असो, मनात प्रबळ जिद्द आणि काहीतरी वेगळं करण्याची तयारी असेल, तर अपयशही यशाकडे नेणारा मार्ग ठरतो. अशीच प्रेरणादायी कहाणी आहे.

Success Story
Success Story
मुंबई : आयुष्य कितीही कठीण असो, मनात प्रबळ जिद्द आणि काहीतरी वेगळं करण्याची तयारी असेल, तर अपयशही यशाकडे नेणारा मार्ग ठरतो. अशीच प्रेरणादायी कहाणी आहे. सातारा जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याची. सुरुवातीला फसवणूक, आर्थिक नुकसान आणि निराशा यांचा सामना करूनही त्यांनी हार मानली नाही. उलट त्या अपयशातून शिकत त्यांनी शेतीत नवनवीन प्रयोग करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि आज कोट्यवधींचा व्यवसाय उभा केला आहे.
advertisement
फसवणुकीतून मार्ग निवडला
दुष्काळग्रस्त भागातील पडाली गावात राहणारे ऋषिकेश जयसिंग धाने हे या यशोगाथेचे नायक आहेत. 2000 च्या सुमारास त्यांच्या गावात एका व्यापाऱ्याने कोरफडीच्या शेतीचे स्वप्न दाखवले. “कोरफड लावा आणि लाखो कमवा” अशा आकर्षक दाव्यांनी अनेक शेतकरी भारावून गेले. हजारो रुपये खर्चून रोपे खरेदी करण्यात आली. मात्र काही महिन्यांतच संबंधित व्यापारी गायब झाला आणि फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. निराश झालेल्या शेतकऱ्यांनी कोरफडीची रोपे उपटून रस्त्यावर फेकून दिली. अशा परिस्थितीत बहुतेकांनी हात टेकले असते, पण ऋषिकेश यांनी मात्र वेगळा विचार केला. त्यांनी टाकून दिलेली सुमारे चार हजार रोपे गोळा करून आपल्या शेतात लावली. हा छोटासा निर्णय त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.
advertisement
संघर्षातून प्रवास
ऋषिकेश यांचं बालपण संघर्षात गेलं. कुटुंबाकडे आठ एकर जमीन असली तरी शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून होती. उत्पन्न कायम अनिश्चित राहायचं. वडिलांचा तुटपुंजा पगार, मर्यादित साधनसामग्री आणि अनेक दिवस अपुऱ्या अन्नावर काढलेले दिवस त्यांच्या आयुष्याचा भाग होते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कुटुंबाला हातभार लावण्यासाठी एका खासगी कंपनीत नोकरी केली, पण ती फार काळ टिकली नाही. नंतर मोरिंगा आणि आंब्याची रोपे विकण्याचा छोटा व्यवसाय सुरू केला, मात्र तोही हंगामी स्वरूपाचा ठरला. सततच्या अडचणींमध्येच कोरफडीची संधी त्यांच्या समोर आली आणि त्यांनी हार न मानता प्रयोग करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
कोरफडीवर केवळ कच्चा माल म्हणून न थांबता, त्यांनी तिच्या उपयोगांवर संशोधन सुरू केलं. पारंपरिक कीटकनाशकांना पर्याय देणारी नैसर्गिक उत्पादने तयार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कोरफड वापरून नैसर्गिक कीटकनाशक, हर्बल स्प्रेडर आणि पिकांच्या वाढीस चालना देणारे अर्क त्यांनी विकसित केले. “कोरफडीचं कडूपण कीटकांना दूर पळवतं, हे माझ्या लक्षात आलं आणि तिथून प्रयोग सुरू झाले,” असं ते सांगतात. केळी, ऊस यांसारख्या पिकांवर त्यांच्या स्प्रेडरचा वापर केल्यावर फवारणी अधिक परिणामकारक होत असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना आला.
advertisement
आता स्वत:चा ब्रँड
2013 पासून ऋषिकेश यांनी आपल्या उत्पादनांना व्यावसायिक स्वरूप दिलं. मार्केटिंगचा अनुभव असलेल्या मित्रांनी त्यांना ब्रँड उभारण्यात मदत केली. हळूहळू स्थानिक बाजारपेठ ओलांडत त्यांची उत्पादने राज्याबाहेरही पोहोचली. आज त्यांच्या शेतात दोन एकरांवर कोरफडीची लागवड आहे आणि दरवर्षी सुमारे 8 हजार लिटर विविध उत्पादने तयार केली जातात. सध्या त्यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल सुमारे 3.5 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असून, नफ्याचा टक्का सुमारे 30 आहे.
advertisement
दरम्यान, फसवणुकीपासून कोट्यवधींच्या व्यवसायापर्यंतचा ऋषिकेश यांचा प्रवास अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. योग्य संधी ओळखून, मेहनत आणि चिकाटी ठेवली तर अपयशही यशाकडे नेऊ शकतं, याचं हे जिवंत उदाहरण आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
जबरदस्त! लोकांनी फेकून दिलेली 4,000 रोपं स्वत:च्या शेतात लावली, अन् साताऱ्याचा ऋषिकेश आता करतोय 3.5 कोटींची कमाई
Next Article
advertisement
Gold Price Prediction 2026: ...तर, २०२६ मध्ये सोनं होणार २० टक्क्यांनी स्वस्त! 'या' एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

View All
advertisement