advertisement

Ayurveda Tips : आयुर्वेदातील कोणत्या दोषानुसार आहे तुमची प्रकृती ? प्रकृतीनुसार करा अन्नपदार्थांचं सेवन, आजारांना ठेवा दूर

Last Updated:

आयुर्वेदानुसार, तीन दोष आहेत. वात, पित्त आणि कफ या शरीराचं नियमन करणाऱ्या तीन मूलभूत ऊर्जा आहेत, ज्यांचा थेट संबंध आपल्या आहाराशी असतो. हे तीन दोष संतुलित असतात, तेव्हा शरीर निरोगी आणि उत्साही वाटतं. पण, त्यांचं संतुलन बिघडलं, तर विविध शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे, कोणत्या चवी कोणते दोष वाढवतात आणि कोणत्या त्यांना शांत करतात, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.

News18
News18
मुंबई : आयुर्वेदानुसार प्रत्येकाची शारीरिक रचना ही वात, पित्त आणि कफ या दोषांवर अवलंबून असते. या दोषानुसार प्रत्येक व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक जडणघडण होत असते.
आयुर्वेदानुसार, तीन दोष आहेत. वात, पित्त आणि कफ या शरीराचं नियमन करणाऱ्या तीन मूलभूत ऊर्जा आहेत, ज्यांचा थेट संबंध आपल्या आहाराशी असतो. हे तीन दोष संतुलित असतात, तेव्हा शरीर निरोगी आणि उत्साही वाटतं. पण, त्यांचं संतुलन बिघडलं, तर विविध शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे, कोणत्या चवी कोणते दोष वाढवतात आणि कोणत्या त्यांना शांत करतात, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.
advertisement
आयुर्वेदात अन्नाच्या सहा मुख्य चवी सांगितल्या आहेत: मधुर म्हणजे गोड, आमल म्हणजे आंबट, लवण म्हणजे खारट, कटू म्हणजे तिखट, तिक्त म्हणजे कडू आणि कषाय म्हणजे काढा. या चवींचा आपल्या शरीरातील दोषांवर वेगवेगळा परिणाम होतो.
advertisement
वात दोष - वात दोष वाढवणाऱ्या चवींमधे तिखट, कडू आणि तुरट चवींचा समावेश होतो. जास्त प्रमाणात तिखट किंवा कडू पदार्थांमुळे वात वाढू शकतो. यामुळे गॅसेस होणं, कोरडेपणा, अस्वस्थता किंवा सांधेदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. वात संतुलित ठेवण्यासाठी गोड, खारट आणि आंबट चवी फायदेशीर मानल्या जातात. उष्ण आणि किंचित तेलकट पदार्थ खाल्ल्यानंही वात शांत होण्यास मदत होते.
advertisement
पित्त दोष - पित्त हे शरीरातील उष्णता आणि पचनशक्तीशी संबंधित मानलं जातं. मसालेदार, आंबट आणि खारट चवींनी पित्त वाढू शकतं. जास्त मसालेदार किंवा आंबट पदार्थ खाल्ल्यानं शरीरातील उष्णता वाढून आम्लपित्त, जळजळ, खाज किंवा त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. पित्त शांत करण्यासाठी गोड, कडू आणि तुरट चवी अधिक चांगल्या मानल्या जातात.
advertisement
हिरव्या भाज्या आणि फळं यांसारखे थंड आणि हलके पदार्थ पित्त संतुलित ठेवण्यास मदत करतात.
advertisement
कफ दोष - कफ दोष शरीराचं स्थैर्य, आर्द्रता आणि शक्ती यांच्याशी संबंधित आहे. गोड, खारट आणि आंबट चवी कफ वाढवू शकतात. या चवींचं अतिसेवन केल तर जडपणा, आळस, वजन वाढणं किंवा कफ होऊ शकतो. तिखट, कडू आणि तुरट चवी कफ कमी करण्यासाठी फायदेशीर मानल्या जातात. सौम्य, उष्ण आणि थोडं मसालेदार जेवण कफ संतुलित ठेवण्यासाठी मदत करतात.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Ayurveda Tips : आयुर्वेदातील कोणत्या दोषानुसार आहे तुमची प्रकृती ? प्रकृतीनुसार करा अन्नपदार्थांचं सेवन, आजारांना ठेवा दूर
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement