सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गावात राहणाऱ्या खंडू म्हाळप्पा माळकर या तरुणाचे शिक्षण बारावी सायन्सपर्यंत झाले आहे. शिक्षण शिकत असताना आईचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. आईच्या निधनानंतर वडील देखील खचून गेले होते. खंडू याने बारावी सायन्सपर्यंत शिक्षण घेऊन पुढे शेती करण्याचा निर्णय घेतला.
Best Food in Pune: दररोज 2000 साबुदाणा वडे, लोकांच्या लागतात रांगा, हॉटेल नाही ही आहे फॅक्टरी!
advertisement
वडील पारंपरिक पद्धतीने उसाची लागवड करत होते. उसाची तोडणी झाल्यावर वर्षाला 70 ते 80 हजार रुपये मिळत होते. मुलाने उसाची लागवड न करता पपईची लागवड करायचा निर्णय घेतला. ऑक्टोबर महिन्यामध्ये खंडू यांनी दीड एकरमध्ये जवळपास 1500 पपईच्या रोपांची लागवड केली. पपईची संपूर्ण शेती खंडू यांनी ऑरगॅनिक पद्धतीने केली आहे. ताक, गूळ, गोमूत्र आणि शेणखत वापरून पपईची लागवड केली आहे. दीड एकरात पपई लागवडीसाठी सर्व खर्च वजा करून दीड लाख रुपयांपर्यंतचा खर्च आला आहे. तर दोन महिन्यात पपई विक्रीतून साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
शिक्षण शिकून देखील तरुणांना नोकरी मिळत नाही, नोकरीच्या शोधासाठी घर, गाव आणि शहर सोडावे लागत आहे. उच्चशिक्षित घेतलेल्या तरुणांकडे अर्धा एकर जरी शेती असली तरी त्यामध्ये नवनवीन प्रयोग करून योग्य पद्धतीने जर पीक घेतली तर नोकरीपेक्षा अधिक उत्पन्न या शेतीतून मिळेल असा सल्ला बारावी सायन्सपर्यंत शिक्षण शिकलेले तरुण खंडू माडकर यांनी दिला आहे.





