केळी पिकाची लागवड वाढू लागली आहे. गारठा वाढतो याचा अर्थ तापमान नैसर्गिकरित्या कमी होते. यामुळे जमिनीचे तापमान देखील कमी होते आणि यामुळे केळी पिकाची अन्न शोषण करण्याची प्रक्रिया मंदावते. त्याचबरोबर थंड हवा जेव्हा हिरव्या पानांवरून जाते तेव्हा पानांतील पेशी तडकतात. आर्द्रतेचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने ही परिस्थिती निर्माण होते.
वय 6 वर्ष, पुण्यातील मिहिराने रचला इतिहास, बनली भारतातील सर्वात तरुण वेटलिफ्टर
advertisement
काय करावेत उपाय?
केळी बागेची लागवड करताना चारही बाजूंनी नेपियर गवताची लागवड केल्यास फायदा होतो. जुन्या साड्या किंवा कार्डे बाजूंनी बांधून थंडीपासून संरक्षण करता येते. त्याचबरोबर बागेमध्ये काही ठिकाणी धूर केल्यास देखील फायदा होतो. पाणी रात्रीच्या वेळी दिल्यास पाणी उष्णता निर्माण करते याचा पिकाला फायदा होतो. तसेच पालाशयुक्त खतांचा वापर केला तर झाडांची प्रतिकारशक्ती वाढते यामुळे केळी रोगाला कमी बळी पडतात आणि चांगली वाढ होते, असे कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथील कृषी तज्ज्ञ राहुल चौधरी यांनी सांगितले.





