जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील लोणगाव येथील जसवंतसिंग यांनी आपल्या पाच एकर वडीलोपार्जित शेतीत रताळी लागवड केली होती. जून महिन्या 18 तारखेला सरी पाडून लागवड करण्यात आली. चार महिने पावसामुळे पाणी देण्याची आवश्यकता भासली नाही.
advertisement
दाणेदार, युरिया आणि अन्य रासायनिक खतांचा वापर केला. तसेच दोन कीटकनाशक आणि बुरशीनाशकांची फवारणी केली. अति पावसामुळे पिकाच्या उत्पादनावर काही प्रमाणात परिणाम झाला. परंतु तरीदेखील एकरी 150 क्विंटलपर्यंत रताळी उत्पादन त्यांना मिळाले.
पाच एकरमध्ये 750 क्विंटल उत्पादन मिळाले आहे. या रताळीला 14 रुपये प्रति किलो असा दर मिळाला. यापासून 11 लाख रुपये होतील. तीन लाख रुपयांचा खर्च वगळता 8 लाख रुपयांचे निव्वळ उत्पादन झाल्याचे शेखावत यांनी सांगितले. रताळे शेती कमी खर्च आणि अधिक उत्पादन मिळवून देणारी असल्याने अन्य शेतकऱ्यांनी देखील ही शेती करावी असा सल्ला शेखावत यांनी इतर शेतकऱ्यांना दिला आहे.





