TRENDING:

भुईमूग पीक येईल जोमात, भरघोस उत्पादन वाढीसाठी अशी घ्या काळजी, कृषी तज्ज्ञांचा सल्ला

Last Updated:

भुईमुगाच्या उत्पादनात वाढ साधण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असून, सेंद्रिय खतांचा वापर कितपत फायदेशीर ठरतो याबाबत सकारात्मक अनुभव समोर येत आहेत. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड : भुईमुगाच्या उत्पादनात वाढ साधण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असून, सेंद्रिय खतांचा वापर कितपत फायदेशीर ठरतो याबाबत सकारात्मक अनुभव समोर येत आहेत. भुईमूग हे महाराष्ट्रातील तसेच देशातील महत्त्वाचे नगदी पीक मानले जाते. या पिकाच्या चांगल्या वाढीसाठी सुपीक जमीन आणि संतुलित अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. सेंद्रिय पद्धतीने खतांचा अवलंब केल्यास जमिनीची नैसर्गिक सुपीकता टिकून राहून पिकाच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होते, असे बीड जिल्ह्यातील महादेव बिक्कड या कृषी अभ्यासकाचे मत आहे.
advertisement

सेंद्रिय खतांमध्ये शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट, हिरवळीचे खत तसेच जैविक जीवाणू संवर्धकांचा समावेश होतो. या खतांमुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते आणि मातीची भुसभुशीत रचना टिकून राहते. परिणामी मुळांना हवा आणि पाणी योग्य प्रमाणात मिळते. भुईमूग हे शेंगधारी पीक असल्यामुळे त्याच्या मुळांवर नायट्रोजन स्थिरीकरण करणाऱ्या गाठी तयार होतात. सेंद्रिय खतांच्या वापरामुळे या गाठी अधिक सक्रिय होऊन पिकाला आवश्यक नायट्रोजन नैसर्गिकरीत्या उपलब्ध होते.

advertisement

Success Story : कौटुंबिक जबाबदारी असताना घेतला निर्णय, महिलेने उभारला मशरूमचा प्लांट, वर्षाला 5 लाखांची कमाई

सेंद्रिय पद्धतीने खतांचा वापर केल्यास भुईमुगाच्या रोपांची वाढ सशक्त होते आणि पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीव नष्ट होतात, मात्र सेंद्रिय खतांमुळे हे सूक्ष्मजीव सक्रिय राहतात. त्यामुळे जमिनीत उपलब्ध असलेली अन्नद्रव्ये पिकाला सहज शोषता येतात. याचा थेट परिणाम उत्पादनाच्या प्रमाणावर आणि दाण्यांच्या भरदारपणावर दिसून येतो.

advertisement

सेंद्रिय खतांचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे उत्पादनाची गुणवत्ता. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भुईमूग चव, पोषणमूल्य आणि टिकाव याबाबतीत अधिक चांगला असल्याचे बाजारातील अनुभव सांगतात. तसेच सेंद्रिय शेतीमुळे पाण्याचे प्रदूषण, मातीचा ऱ्हास आणि पर्यावरणावरील दुष्परिणाम कमी होतात. दीर्घकालीन शेतीसाठी ही पद्धत अधिक शाश्वत मानली जात आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यात घडलं! 'मफिन'ला मिळालं नवं आयुष्य,श्वानावर अवघड शस्त्रक्रिया यशस्वी Video
सर्व पहा

एकूणच भुईमुगाच्या वाढीसाठी सेंद्रिय खतांचा अवलंब करणे आर्थिक, पर्यावरणीय आणि कृषीदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे. सुरुवातीला थोडा अधिक परिश्रम आणि नियोजनाची गरज भासली तरी भविष्यात उत्पादन खर्चात बचत आणि चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता वाढते. त्यामुळे भुईमुगाचे शाश्वत आणि लाभदायक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय खतांच्या वापराकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
भुईमूग पीक येईल जोमात, भरघोस उत्पादन वाढीसाठी अशी घ्या काळजी, कृषी तज्ज्ञांचा सल्ला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल