जेव्हा मंगळ आपल्या स्वराशी वृश्चिकेत येतो, तेव्हा त्याची ऊर्जा आंतरिक स्तरावर खोलवर काम करते. याचा थेट परिणाम बाजारपेठ, गुंतवणूक, भूमी-उद्योग, ऊर्जा कंपन्या आणि वस्तू-विनिमय दरांवर होतो.
वृश्चिक राशी ही मंगळाची स्वरास मानली जाते. ज्योतिषशास्त्रात मंगळाला या राशीचा स्वामी सांगितलं गेलं आहे. इथे आल्यावर मंगळ ग्रह बलवान होतो. त्यामुळे, २७ ऑक्टोबर २०२५ ते ७ डिसेंबर २०२५ या दरम्यान भूमी-संपत्ती, लोखंड, तांबे, सोने, पेट्रोलियम आणि कोळसा यांसारख्या गोष्टींच्या भावात वाढ दिसून येऊ शकते.
advertisement
फलदीपिका ग्रंथामध्ये सांगितलं गेलं आहे की, स्वराशौ मङ्गले शुभं फलति* (म्हणजे मंगळ जेव्हा आपल्या घरात असतो, तेव्हा शक्ती, धैर्य आणि बाजारातील हालचाल वाढते). याचा अर्थ असा होतो की उद्योग क्षेत्र, यंत्रसामग्री, बांधकाम आणि स्थावर मालमत्ता (रियल इस्टेट) यांसारख्या क्षेत्रांमध्ये व्यवहार आणि मागणी वाढेल.
याउलट, जलतत्त्वाची राशी (वृश्चिक) आणि अग्नी ग्रह (मंगळ) यांची उपस्थिती अस्थिरता घेऊन येते. त्यामुळे शेअर मार्केट, चलन व्यवहार (करन्सी ट्रेड) आणि लक्झरी लाईफस्टाईलशी संबंधित वस्तूंमध्ये चढ-उतार कायम राहतील.
जातक पारिजातमध्ये म्हटलं आहे की, अग्निजलयोः संयोगे अस्थैर्यम् (म्हणजे अग्नी आणि पाण्याचा संयोग अस्थिरता देतो). यामुळे स्टॉक मार्केटमध्ये सट्टेबाजीचे व्यवहार आणि घाबरून विक्री (Panic Selling) करण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून हे गोचर धैर्य आणि दूरदृष्टी ठेवण्याची वेळ आहे. अल्प मुदतीचा फायदा अपेक्षित असलेल्या गुंतवणूकदारांना या अस्थिरतेचा फटका बसू शकतो, तर दीर्घ मुदतीचे (3-6 महिन्यांपेक्षा जास्त) गुंतवणूकदार लाभ मिळवू शकतात. भूमी, ऊर्जा, धातू आणि बांधकाम साहित्यात नियोजनबद्ध गुंतवणूक शुभ राहील, पण कर्ज घेऊन किंवा भावनांच्या भरात केलेली गुंतवणूक तोटादायक ठरू शकते.
जैमिनि सूत्र सांगतं की मङ्गलात् भूम्यर्थं यन्त्रं च (म्हणजे मंगळ यंत्रसामग्री आणि जमिनीच्या विकासाला गती देतो). हे गोचर सरकार आणि खासगी क्षेत्र या दोन्हींमध्ये पायाभूत सुविधा किंवा संरक्षण गुंतवणुकीला गती देऊ शकते. याउलट, जल-आधारित क्षेत्रांमध्ये (जसे पेय पदार्थ उद्योग, लक्झरी वस्तू, गारमेंट, आयात केलेले ब्रँड्स) स्थिरता किंवा मंदी येऊ शकते.
मनोवैज्ञानिकदृष्ट्या हे गोचर लोकांमध्ये निर्णय घेण्याची त्वरा आणि अधीरता वाढवतं. त्यामुळे गुंतवणूकदारांना सल्ला दिला जात आहे की, कोणताही निर्णय घेण्याआधी डेटा, कंपनीचे मूलभूत घटक आणि मूळ ज्योतिषीय कालचक्र या दोन्हींचा अभ्यास करावा. सरावली ग्रंथात म्हटलं आहे की मङ्गलेन धैर्यं हीनस्य नाशः (म्हणजे अधीरताच विनाशाचं कारण बनते).
थोडक्यात सांगायचं झाल्यास, या गोष्टी लक्षात ठेवा:
महाग होणाऱ्या वस्तू: लोखंड, तांबे, पेट्रोलियम, कोळसा, जमीन, स्थावर मालमत्ता (रियल इस्टेट).
स्वस्त किंवा अस्थिर वस्तू: शेअर मार्केट, चलन, लक्झरी ब्रँड्स, आयात केलेला माल.
काय करावं: दीर्घ गुंतवणूक, जोखमीचं संतुलन राखणे, विविधीकरण (Diversification).
काय करू नये: कर्जावर गुंतवणूक, घाई करणे, अफवांवर विश्वास ठेवून निर्णय घेणे.
या गोचराचा अर्थ असा आहे की, बाजार आता खोलवर चालणारा महासागर बनत आहे. पृष्ठभागावर चढ-उतार होतील, पण जे गुंतवणूकदार संयम आणि विवेक वापरून निर्णय घेतील, त्यांना पुढील चक्रात फायदा मिळेल.
Baba Vanga Predictions: वर्ष 2026 मध्ये मालामाल होणार! बाबा वेंगाची भविष्यवाणी ऐकून जाग्यावर नाचणार या राशींचे लोक
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
